Thursday, 3 December 2020

बी. ए.भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका -४ /सञ-३ / काव्यगंध

बी. ए.भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका -४

सञ-३

काव्यगंध

विषय प्राध्यपक प्रा. बी. के पाटील

 नारायण सुर्वे यांची "पोष्टर" : कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या तरुणांचे भावविश्व.

         पोष्टर ही कविता कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या ,कामगार चळवळीतील पडेल ते काम करणार्‍या आणि त्यासाठी मिळेल ती जबाबदारी उचलणार्‍या तरुणांचे भावविश्व अतिशय समर्थपणे व्यक्त करते.

   कवितेचा निवेदक ,हणम्या, शिंदे आणि इसल्या असे हे चार घरातले चौघेजण कामगार वस्तीतल्या तरुणांचे प्रतिनिधी आहेत. कामगार आंदोलनाचे पोष्टर डकवण्याचे काम ते राञीच्या वेळी करतात. एकजण शिडी घेतो. ,दुसरा खळ लावतो. तिसरा पोष्टर चिकटवतो आणि चौथा सगळ्यांना मदत करतो. हे काम अर्थातच चळवळीसाठी विनामूल्य चालले आहे.

    हे काम करतांना ते एकमेकांशी मिञत्वाच्या नात्याने बोलत आहेत. पोष्टर खिडकीपाशी चिकटवायचे नाही. कारण तिथे इसल्याची "मैना" राहते.खडूस बुढ्याची तक्रार ते करतात.

     दुसरे दिवशी मीटिंग आहे पण इसल्याला झोप अनावर होते.तेव्हा तू ह्या शिडीवर झोप. तुला तिघेही असच उचलून कबरस्तानात नेतो अशी त्याची चेष्टा करतात.इसल्याच्या शादीचे बेत रचतात. आणि आपल्याही घरात एक दुल्हन येईल असे स्वप्न बघतात. बुढ्यासाठी चश्मा घेण्याचाही त्याचा विचार आहे,त्यांची स्वप्ने किती साधी आहेत... या तरुणांचे हे भावविश्व कवीने या कवितेत अचूक पकडले आहे.

 कवी हा कामगार वस्तीत राहणारा,तेथील विश्व काव्यात मांडणारा आहे.म्हणून त्याची शब्दकळाही तशीच आहे.या कवितेतही मराठी, हिंदी, उर्दूमिश्रित भाषा कवी वापरतो.

   उदा: इसल्याची माॅं बडी कडक बाई.नजर बचाके भागा.

शू शोर मत कर.

    कवी प्रसिध्द शायर मिर्झा गालिबच्या एका जगप्रसिध्द शेरावर आधारित ओळी इसल्याबाबत वापरतो.

    यासगळ्यामुळे कवितेची उंची  फार वाढते. अशी ही पोष्टर कविता कामगारांच्या हक्कासाठी लढणार्‍या तरुणांचे भावविश्व रेखाटणारी महत्वाची कविता आहे.

............................................

बी ए भाग २/ इतिहास/सेमिस्टर ३, पेपर क्र. ४/भारताचा इतिहास

 

बी. ए. भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका ४ / काव्यगंध/ सञ -३/ गिरणीची लावणी- कामगारांच्या घामाची कहाणी

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका ४

काव्यगंध

सञ -३

विषय प्राध्यापक- प्रा. बी. के. पाटील

गिरणीची लावणी- कामगारांच्या घामाची कहाणी.

         प्रस्तावना-  सुर्वेचा ऐसा गा मी ब्रह्म १९६२ साली प्रकाशित झाला आणि मराठी कवितेला एक नवा आयाम मिळाला. चिञमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष ठरला.

     "चाक फिरे गरगरा। सूत निघे भरभरा।

        नटवया वसुंधरा। आमच्या घामातून।

         नाना रुतुंच्या हो कळा।खुलवी माझा वस्ञमळा।

           मरवा मोतिया पिवळा। तुरा खोवून।।"

            अशी ही नारायण सुर्वे यांच्या" गिरणीची लावणी" आहे. लोककलांशी सुर्वे यांचा जवळचा संबंध आहे.या संस्कारातून या गीताची निर्मिती झाली असावी. सुर्वे यांच्या गीतातील अनुभवाचा घाट गझल सदृश रचनेप्रमाणे साधाच राहिला आहे.

     सुर्वे यांची गिरणीची लावणी ही अनेक गुणांनी युक्त आहे. हे गीत फार गाजले या गीतात कापड गिरणीच्या दुनियेचे शब्दचिञ आले आहे. सकाळी सात वाजता भोंगा भूपाळी गातो आणि मोठ्या डौलात गिरणीची पहिली पाळी सुरु होते. चाके गरगरा फिरतात. सुत भरभरा निघते.

       कामगार स्वत:च्या घामातून वस्ञे निर्माण करतो. ही वस्ञे वसुंदरेलाही नटवितात. नऊवारी सूत परिधान केलेल्या बाबिणीचा नखरा भारी असतो. साच्यातून गोल कांडी फेरे मारते. झडपीने वारा घातला जातो.तुटलेल्या ताराही जुळवून घेतल्या जातात.ही घामाची कहाणी आहे.

     ही नाना रंगांची दुनिया आहे. इथे आभाळाचा रंग घेऊन,हिरव्या सोनाळ शेताचा गंध घेऊन, सात रंगी   इंद्रधनूत वस्र भिजवले जाते. 

      कवितेत नाना रुतुंचे खुबीदार वर्णन आले आहे रुतुचक्रांचे स्पंदन आणि वरदान या वस्रमळ्यात आहे.भोळा कबीर शेले विणतो आहे व जगाला नटवतो. वेगवेगळ्या रंगांची ,वेगवेगळ्या कपड्यांची ही दुनिया आहे.कवी आपल्या लावणीचे नाते थेट कबीरांशी व दौपदीशी जोडतो. पण आज ही वस्रे बनवणार्‍या कामगाराची लज्या कोण राखणार आहे? आज राबणारा चोर ठरला आहे. ऐतखाऊ शिरजोर झाला आहे.

         लावणी या काव्यप्रकाराचा पूर्वीच्या शाहिरांनी  वापर केला पण सुर्वे कितीतरी वेगळ्या दृष्टिकोणातून लावणी वापरतात.यामुळे गिरणगावातील ही घामाची कहाणी जणू जिवंत होते.

बी.ए. भाग२ / मराठी अभ्यासक्रमपञिका ४/ सञ ३/ माझी आई- नारायण सुर्वे

बी.ए. भाग२

मराठी अभ्यासक्रमपञिका ४

सञ ३

माझी आई-   नारायण सुर्वे.

विषय प्राध्यापक- प्रा. बी. के. पाटील.

  माझी आई-  कामगार वस्तीतील  आईचे रेखाटन.

          अनेक कवीनी आई या विषयावर कविता केल्या आहेत. तसे पाहाता सुर्वे याला अपवाद नाहीत काव्यगंध या कवितासंग्रहात त्यांच्या माझी आई या कवितेचा समावेश आहे अर्थात आई या विषयावरची ही फार वेगळी कविता आहे.

      याचे कारण म्हणजे ही कामगार जगतातील आई आहे.सुर्वे यांच्या सर्वच कवितामध्ये कामगार जगाचे प्रतिबिंब पडले आहे  

       सुर्वे म्हणतात, जेव्हा तारे विझू लागतात, उंच भोंगे वाजू लागतात तेव्हाकामगारांच्या दींड्या रोजच भोंग्याच्या दिशेने वळतात. आईही झपझप पावले टाकत,मुलाकडे सतत मागे वळून बघत जात असते. जाताना ममतेने सांगे "कुणाशु भांडत बसू नका" आणि दोन पैसेही मुलांच्या हातात ठेवत असे.

        दसर्‍यात खंडेनवमीला ती मुलांना घेऊन कारखान्यात जात असे.कारखान्यातील आरास बघण्यासाठी कवी जात असे

"किती मज्जा म्हणून सांगू

  शब्दसाठे झालेत पंगू"

     यावेळी कवी फुग्यांचे पतंग झोकून कवी पक्षीच होत असे

        पण एक दिवस काही घडले.आईला गाडीतून आणले .तिचे डोळे उघडे होते व तोंडातून रक्त भळभळत होते.तिच्याबरोबर तिची जोडीवाली साळू होती तिने मुलांना जवळ घेतले मुले मिटीमिटी बघत होती 

       कामगार जगतातील भावंडांच्या वियोगाने झालेली कमालीची निराधार अवस्था त्यातून येणारे कलंदरपण याचे सुर्वे यांनी प्रत्ययकारी शैलीत चिञण केले आहे. 

        ही कविता म्हणजे एका अनुभवाचे कथन आहे. कवितेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कष्टकरी जीवनातील वेदना, आईचे वात्सल्य, तिच्या मृत्युचे कारुण्य हे परस्पर संवादभाव संघटित केले आहे. कायम लक्ष्यात राहावी. मनाला चटका लावून जावी अशी सुर्वे यांची ही कविता.

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ / सञ ३/ नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस

बी ए भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ ३

विषय प्राध्यापक - बी के पाटील

नारायण सुर्वे- कविता - दोन दिवस

         कवी नारायण सुर्वे परिचय :

                   कवी नारायण गंगाराम  सुर्वे यांचा जन्म मुंबईत १५ आॅक्टोबर,१९२६ रोजी झाला. गंगाराम सुर्वे यांनी नारायण सुर्वेचे संगोपण केले .गंगाराम सुर्वे गिरणीकामगार होते. नारायण सुर्वेंचे बालपण याच परिसरात गेले.

      वयाच्या ३६व्या वर्षी १९६२ साली ऐसा गा मी ब्रह्म हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 

साहित्यसंपदा  :ऐसा गा मी ब्रह्म ,माझे विद्यापीठ, जाहीरनामा इ. पुस्तके नावावर आहेत.

    मिळालेली पारितोषिके :

            माझे विद्यापीठ हा काव्यसंग्रह १९६६ मध्ये प्रसिध्द झाला याला ११ पारितोषिके मिळाली,

 १९७३ सोव्हिएत लॅन्ड नेहरु अॅवार्ड माझे विद्यापीठ' ला.

१९९८पदमश्री पुरस्कार


    मराठी कवितेत स्व:ताचे वेगळे स्थान निर्माण करणारे नारायण सुर्वे यांचे१६ आॅगस्ट २०१० रोजी ठाणे येथे निधन झाले.

          दोन दिवस

दोन दिवस ही कविता दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दु:खात गेले असे सांगत या दिवसांचा ताळेबंद मांडते. आता डोईवर  किती उन्हाळे राहीले याचा हिशोब कवी मांडतो आहे, कवी उन्हाळे मोजतो आहे, कारण हे जीवनच तसे आहे.

      आकाशात चंद्र, तारे आले. राञी धुंद झाल्या. पण हे निसर्गसौंदर्य कवीने कधी पाहिलेच नाही, हा आनंद घेतलाच नाही कारण....

 भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली असे कवी म्हणतात. कवीने कधी स्वत:पुरता विचार केलाच नाही. सदैव जगाचा, भोवतालचा विचार केला . म्हणूनच

   " दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो" असे कवी म्हणतात.

   भट्टीमध्ये पोलाद गरम करुन त्याला आकार दिला जातो. आपल्याही आयुष्याला असाच आकार येत गेला असे मोठ्या अभिमानाने कवी सांगतो. कवी कधीच तक्रार करत नाही.तर हे आयुष्यच बदलून टाकेन असा विश्वास व्यक्त करतो ही आशावादी  वृत्तीच कवीच्या कवितेचे वेगळेपण आहे यात शंका नाही.

बी ए भाग (१विद्याशाखीय विशेष गाभा DSC-A1) / मराठी(ऐच्छिक) पेपर क्रं१ / चिञपट: दृकश्राव्य माध्यम,छायाचिञण,पटकथा, संवाद

बी ए भाग (१विद्याशाखीय विशेष गाभा DSC-A1)

मराठी(ऐच्छिक) पेपर क्रं१

चिञपट: दृकश्राव्य माध्यम,छायाचिञण,पटकथा, संवाद

 विषय प्राध्यापक: बी.के. पाटील

       चिञपट हे एक दृक श्राव्य माध्यम :

         चिञपटाशी समानार्थी असणारे अनेक शब्द आहेत विशेषत: फिल्म, मोशन मूवी, सिनेमा हे शब्द महत्वाचे आहेत फिल्म हा शब्द प्लास्टिक कोटींगच्या पारदर्शक व गुंडाळी करता येणार्‍या रीळाशी संबंधित आहे. या मध्ये कॅमेर्‍याने चिञित केलेली दृश्य व संगीताचे तसेच ध्वनीचे संकलन करता येते आणि फिल्म यंञाच्या साह्याने पडद्यावरती दाखविते येते.

      आठ एम एम, सोळा एम एम ,पस्तीस एम एम ,सत्तर एम एम यावरुन चिञपटास फिल्म असे म्हटले जात असावे. मोशन मूवी म्हणजे चलत चिञपट

      थोडक्यात मोशनमूवी म्हणजे हलणार्‍या वस्तूचे कॅमेर्‍याच्या साह्याने केलेले चिञिकरण. सिनेमा शब्द हा इंग्रजीत आहे तो चिञपटामधील दृश्याची संबंधित आहे म्हणून चिञपट म्हणजे कॅमेर्‍याने दृश्यीत केलेल्या दृश्यांची मालिका असे म्हणता येईल .

       चिञपटात खालील बाबी असतात

      १.आयडिया म्हणजे कल्पना

       २.संकल्पना

       ३.कला दिग्दर्शक व त्याची संहिता

        ४कॅमेरा व त्याची उपकरणे

        ५.वेशभूषा व त्याची संहिता

         ६.विचार व तत्वज्ञान

         ७कथा, पटकथा, संवाद आणि गीते

           ८.प्रकाश योजना

            ९. दिग्दर्शक व त्याच्या संहिता

              १०.रंगभूषाकार

                ११.संकलक व त्याचे संकलन

                 १२.व्हिडिओ इफेक्ट

                  १३.ग्राफिक्स व पोस्टर डिझाइन

                    १४.निर्मिती व्यवस्थापन व त्याची संहिता

                      १५.प्रसिध्दी व्यवस्थापन

        अशा बर्‍याच घटकांचा समावेश होतो.

पटकथा:     

           पटकथेला इंग्रजीमध्ये स्कीन प्ले म्हणतात. पटकथेत कथेची विभागणी वेगवेगळ्या दृश्यात होते. एका चिञपटामधून दिग्दर्शकाला जसं काही सांगायचं असतं तसेच प्रत्येक दृश्यामधून  काही सांगायचं असतं. 

       पटकथेत लेखक काय सांगतो हा कळीचा मुद्दा आहे स्थुलमानाने वेळ, स्थळ, पाञपरिचय, कलाकाराची कृती, त्यांचा अभिनय, प्रकाश योजना, दृश्यामधील वातावरण, स्थळ वर्णन पाश्व संगीत ,इ.बाबी येतात.तसेच चिञीकरणानंतर संकलन!डी. आय, डबिंग' व्हिडिओ ,स्पेशल इफेक्ट,इ संस्कार होतात. पटकथा ही दिग्ददर्शक, कलादर्शक, कॅमेरामन, संगीतकार, वेशभुषाकार प्रकाशयोजनाकार,पाश्वसंगीत यांना सामग्री पुरविते.

       पटकथा म्हणजे शूटिंग करावयाच्या दृश्यांची संरचना आहे. अलीकडे पटकथेला तांञिक स्वरुप येऊ लागलं आहे.

      संवाद:

               चिञपटाची पहिली भाषा कॅमेर्‍याची असली तरी संहितामधील भाषिक सामग्रीही खूप महत्वाची आहे. उदा  शोले मधील गब्बर सिंग चा डायलाॅग 'कितने आदमी थे ? डाॅन मधील अमिताभचा डायलाॅग 'डाॅन को पकडना मुश्कील ही नही नामुमंकीन है!'  किंवा आताच्या सैराट मधील आर्चीचा संवाद'मराठीत सांगितलेलं समजत नाही का? इंग्रजीत सांगू' 

         मुळात चिञपट माध्यम चिञपटांमधून सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न करते निधान वस्तुनिष्ठतेचा आभास निर्माण करते. त्यासाठी चिञपटाची भाषा वस्तुनिष्ठतेने व्यक्त होणे गरजेचे आहे. काव्यात्मक , अलंकारीक भाषेला चिञपटामध्ये वावडे नसले तरी सर्रासपणे अशी भाषा वापरली जात नाही. तसेच उच्यारावरही लक्ष दिले जाते, अनावश्यक भाषेचा वापर टाळला जातो. 

    उदा. अलीकडच्या बबन ,ख्वाडा चिञपटामध्ये शिव्याचा वापर आहे चिञपटाची भाषा वस्तुनिष्ठ करण्याकडे तोकल आहे. अलीकडे हिंदी,मराठी चिञपटामधून व  गाण्यामधून प्रेक्षकावर्ती होणारा परिणाम लक्षात घेऊन भाषेचा वापर होताना दिसतो.

   उदा. मुन्नी बदनाम हुई. झेंडू बाम हुई या गाण्यामध्ये वापरलेला झेंडू बाम  शब्द किंवा सिंघम चिञपटामध्ये वापरलेली भाषेची टॅगलाईन 'आता माझी सटकली' यावरुन एक गोष्ट लक्षात येते समाजामध्ये संमिश्र भाषेचा वापर होतोय. म्हणून चिञपटाची किंवा गाण्याची भाषा बदलते.

बी ए भाग ३ /मराठी पेपर क्रं ७ / सञ - पाचवे /साहित्यविचार - अलंकार उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण


बी ए भाग ३

मराठी पेपर क्रं ७

सञ - पाचवे

साहित्यविचार - अलंकार

उपमा अलंकार-स्वरुप व उदाहरण

विषय प्राध्यापक-बी.के. पाटील

    मराठी भाषेतील महत्वाच्या अलंकारापैकी एक म्हणजे उपमा अलंकार आहे.

व्याख्या- जेव्हा दोन गोष्टीतील साम्य पाहिले जाते, एक वस्तू दुसर्‍या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते तेव्हा उपमा हा अलंकार होतो.

   या अलंकारात दोन गोष्टीमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते.

     उपमा अलंकारात ज्याला उपमा दिलेली असते त्या वस्तूला उपमेय म्हणतात. तर ज्याची उपमा दिलेली असते त्याला उपमान म्हणतात.

     उपमा अलंकारात दोन वस्तूमधील सारखेपणा किंवा साधर्म दाखविण्यासाठी सम, समान, परी, गत , सारखा , प्रमाणे असे शब्द वापरले जातात.

      उदा.:

१.सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी.

      वरील ओळीत सावळा रंग हे उपमेय आहे. याउपमेयाला पावसाळ्यातल्या नभाची म्हणजे ढगाची उपमा दिली आहे. म्हणून पावसाळी नभ हे उपमान आहे

२.आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

३.असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी,

४मुंबईची घरे माञ लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी.

...........................................

  अनुप्रास अलंकार स्वरुप व उदाहरणे.

व्याख्या:   शब्दांच्या किंवा व्यंजनांच्या पुनरावृत्तीमुळे जो अलंकार होतो त्याला अनुप्रास असे म्हणतात. एकच अक्षर पुन:पुन्हा आल्याने नादमधुरता निर्माण होते व काव्याला सौंदर्य प्राप्त होते.

      उदा.

१.गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

     शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

      रजनीतल ताम्रनील स्थिर पल जल पल सलील

       हिरव्या तटि कृष्ण मेळ खेळे

     बा भ बोरकरांची या काव्यमय ओळी अत्यंत नादमय आहेत 'ल' या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे त्या ओळींना एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

२.अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुल

     रुप्याचा वाळा तान्हा बाळा तीट लावू.

३,आज गोकुळात रंग  खेळतो हरी।

     राधिके जरा जपून जा तुझ्याघरी।

    असा हा अनुप्रास अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती करणारा. वाचकांना मनमुराद आनंद देणारा.

...........................................

रुपक अलंकार स्वरुप व  उदाहरणे   व्याख्या: जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरुप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रुपक अलंकार होतो.

       उदा:

   १.     लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.

   २.     देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर

    ३.     समिधाच सख्या या। यात कसा ओलावा।।

             कोठुनि फुलापरि। वा मकरंद मिळावा

   ४.आई भरलं आभाळ। आई नितळ सागर।

       आई चांदणं दुधाळ। आई मायेचे आगर।।

        आई सरिता निर्मळ ।आई हिरवं शिवार।

          आई फुलांचा दर्वळ ।आई मांगल्य अपार।।

    ही कविता नामदेव शिंदे यांची असून ही आईवरची कविता म्हणजे रुपक अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing