Friday, 11 December 2020

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४/ सञ :३/ काव्यगंध/ वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

 बी ए भाग  २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ  :३ काव्यगंध

विषय प्राध्यापक प्रा. बी के पाटील

वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

परिचय  :वसंत आबाजी डहाके यांचा जन्म ३०मार्च,१९४२ रोजी यवतमाळ जिल्हातील बेलोरा या गावी झाला.१९६० पासून ते कविता लेखन करत आहेत. १९६६साली सत्यकथा मासिकात योगभ्रष्ट कविता प्रसिद्भ झाली. चंद्रपुरमधिल २०१२च्या ८५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    १९७२चा योगभ्रष्ट हा त्यांचा पहीला काव्यसंग्रह,त्या नंतर शनु:शेष, चिञलिपी इ. काव्यसंग्रह प्रसिद्भ झाले. 

    काव्य लेखनामागे डहाके यांच्याजाणिवांचे अंत:सूञ आहे.

त्या संध्याकाळी समूद्र या कवितेतील वसंत आबाजी डहाके  यांच्या मनाची अवस्था  :

        या कवितेत  कवी समुद्र आपल्याला रक्ताळलेल्या घोड्यासारखा दिसला असे म्हणतात. कवी मुबईभर फिरला.त्याला कुठेच करमेना.पण प्रत्येक क्षणी समुद्र आपल्या आसपास आहे असेच त्याला वाटत होते.

     ही कविच्या मनाची अवस्था आहे .

मुंबई हे महानगरीय कवीला समुद्रासारखे विशाल, घोड्यासारखे गतिमान वाटले. माणसे विवीध कारणांनी जीवनभर दु:खी असतात.ती आपले दु:ख विसरायला समुद्रावर जातात. या संगळ्याचे दु:ख समुद्र पोटात घेतो. या अर्थाने समुद्र, संध्याकाळ आणि समुद्राचे जखमी असणे यांचे जवळचे नाते आहे असे कविला वाटते.

       मुंबईतला अरबी समुद्र हा दृश्य आहे. तो  दिसतो. पण असाच एक अदृश्य समुद्र कवीच्या मनातही आहे, या कवितेत तो कविची साथ सोडतच नाही कविला कुठेच करमत नाही भटकंतीत सर्वच ठीकांनी हा समुद्र आहेच

    या कवीतेत ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे सुखाचे झबले घालून प्रत्यक्षात दु:खच आपल्याकडे येत असते.आपल्याला वाटते सुख आले आहे, हीच अनुभूती कवी घेतो.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Syllabus_AEC_BA II

    Course Name: English for Communication – III Course Category: Ability Enhancement Course (AEC) Semester III Total Marks: 50;    ...