Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: राष्ट्रवाद

Wednesday 30 June 2021

राष्ट्रवाद

 Sawant R.

 बी.ए.3 सेमी 6 इतिहास पे.क्र. 14 आधुनिक जगाची निर्मिती (16वे शतक ते 19वे शतक) 

 घटक 2  राष्ट्रवाद. 

          अ. राष्ट्रवादाच्या उदय व प्रसाराची कारणे.  

           ब. इटली व जर्मनीचे एकीकरण.  

            क. परिणाम.

घटक २. राष्ट्रवाद 

 

अ) राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे-  

प्रस्तावना- राष्ट्र Nation राष्ट्रीयत्व Nationality हे शब्द लॅटिन 'नेटस्' Natus या शब्दापासून बनला आहे. 'नेटस्' या लॅटिन शब्दाचा अर्थ एखादा वंश race असा आहे. ' राष्ट्र म्हणजे ज्या राज्यात एखादा जनसमुदाय मूलभूत अशा प्रेरणांनी एकत्रित येतो आणि ज्या प्रेरणा इतक्या मजबूत असतात आणि ज्या इतक्या जिवंत वाटतात की त्याकरीता त्यांची एकत्र राहण्याची तयारी असते.अशा समुहाला राष्ट्र ही संज्ञा प्राप्त होते.  

फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य,समता ,बंधुता व मानवता या तत्वांची देणगी जगाला दिली. आधुनिक राष्ट्रवादाचा त्यातुनच उदय झाला. ज्या लोकांची भाषा,वंश,परंपर,संस्कृती, भौगोलिक वसतिस्थान समान आहे अशा लोकांमधे, समाजामध्ये राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो.  

   राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे  

अ) सरंजामशाहीचा-हास- मध्ययुगात युरोपात सरंजामशाहीचा प्रभाव होता.सर्वसामान्य लोकांची ते पिळवणूक करीत. सरंजामशाहीची त्यांच्याच देशात छोटी छोटी राज्ये होती. सरंजामशाहीचा अंत सर्वसामान्य लोकांनी केला. युरोपात राष्ट्रीय भावना निर्माण होण्यास मदत झाली.  

ब) भौगोलिक एकता- समान भुप्रदेशातील लोकांमध्ये मातृभुमीच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना निर्माण झाली.  

क) समान ऐतिहासिक वारसा- प्रत्येक मानवी समूहाला ऐतिहासिक वारसा मिळाला आहे. राष्ट्रवादाच्या उदयासाठी हे कारण उपयुक्त ठरले.  

ड) समान हितसंबंध- भुप्रदेशातील लोकांचे राजकीय,सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हितसंबंध समान असतील तर यातुनही राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो.

[6/30, 17:59] Kavitq: ह ) परकीय राज्ये : युरोपातील काही राज्यांनी आपली सत्ता परराज्यावर स्थापन केली होती . अशा राज्यात राष्ट्रीय भावनेचे संवर्धन किंवा विकास होण्यास मदत झाली . परकीय सत्ताधिशांनी तेथील लोकांना गुलाम बनवून स्वतःच्या कल्पना , जीवनपध्दती , संस्कृती लादली व आर्थिक पिळवणूक केली . दडपशाहीचा उपयोग करून राजकीय सत्तेचा वापर केला . तेव्हा दडपशाही राजकीय सत्तेविरुद्ध लोक एकत्र आले . त्यांनी राष्ट्रवादी भावनेने आपला लढा उभारला . स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष उभा केला . 

 ज ) व्हिएत्रा परिषदेतील निर्णय : नेपोलियनच्या युरोपातील साम्राज्याचे व्हिएन्ना  परिषदेतील करारामुळे विघटन झाले . अनैसर्गिक एकीकरण व्हिएना कराराने केले गेले  .  

ल ) राजकीय महत्वाकांक्षा : कोणत्याही देशातील लोकांना आपल्या देशाची भविष्यकाळाविषयी महत्वाकांक्षा असते . पारतंत्र्यातील लोकांना स्वातंत्र्य होण्याची , स्वतंत्र राष्ट्राला वैभवशाली बनविण्याची महत्वाकांक्षा ही लोकांच्या ठायी असते . ते भविष्य साकार करण्यासाठी लोक आपआपसातील मतभेद मिटवून देशकार्य , देशहित याकरिता लक्ष देतात . यातून राष्ट्रवादाचा उदय होतो . 

 म ) थोर लेखकांचे योगदान : एक राष्ट्रीयत्वाची भावना सतत तेवत ठेवण्याचे कार्य हे त्या - त्या राष्ट्रातील थोर साहित्यकारांनी नेहमीच केलेले आहे . त्यामध्ये मोठमोठे तत्त्वज्ञ , राजनीतीज्ञ, कुटनितज्ञ आणि राजकारणी यांनी केलेले लिखाण राष्ट्रीय भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे . मॅकिया व्हॅली , हॉब्स , रूसो , व्हॉल्टेअर , थॉमस पेन , माँटेस्क्यू , रविंद्रनाथ टागोर , स्वातंत्र्यवीर सावरकर , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इ . विचारवंत लेखकांनी राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले आहे .

[6/30, 18:00] Kavitq: राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे.  

 

इ ) वंश , धर्म , भाषा यांचे ऐक्य : एकच वंश , समान धर्म व भाषा ही भावना परस्परांची मने जुळविण्यास अत्यंत प्रभावी ठरलेली आहेत . समान वंशीय लोक एकत्र येण्याची प्रक्रिया सतत चालूच असते . २० व्या शतकाच्या प्रारंभी याचाच हिटलरने उपयोग करून वांशिक एकतेचे आवाहन केले . जर्मन राष्ट्रवादाचो पुननिर्मिती केली होती . तसेच धार्मिक एकताही महत्वाची मानली जाते . कारण लोकांच्या धर्मावर गदा आल्यास धर्मरक्षणार्थ हजारो लोक प्राणत्याग करतात , त्यामुळे एक राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते . यातून राष्ट्रवाद निर्माण होतो . 

 फ ) युरोपातील धार्मिक सुधारणा चळवळ : मध्ययुगात युरोपात चर्च आणि धर्मगुरू यांना अत्यंत मानाचे स्थान होते . त्यांच्याजवळ अत्युच्च सत्ता होती . पवित्र रोमन साम्राज्यात पोप आणि रोमन राजा हे अनुक्रमे धार्मिक व राजकीय प्रमुख मानले जात असत . त्याकाळात युरोपात कोठेही स्वतंत्र राष्ट्र - राज्य नव्हते . परंतु धर्मसुधारणेच्या चळवळीमुळे लोकांत जी जागृती निर्माण झाली . परिणामी पोप व रोमच्या राजाचे पद दुर्बल बनले आणि


Sawant R., [30.06.21 21:16]

युरोपात राष्ट्रीय भावना ठिकठिकाणी निर्माण झाली . यातून युरोपात राष्ट्र राज्यांचा उदय झाला . १५३४ मध्ये इंग्लंडचा आठवा हेन्री राजाने पोपची धार्मिक व राजकीय अधिसत्ता झुगारून दिली . इंग्लंडचे नवे धोरण आखले .  

ग ) निरनिराळ्या काळात झालेली युध्दे : मध्ययुगात जी विविध युध्दे झाली . त्याकारणाने लोकांच्यात नवचैतन्य निर्माण झाले . त्यामुळे राष्ट्रवादी भावनेला उत्तेजन मिळाले . इंग्लंड - फ्रान्स यांच्यात शंभर दिवसांच्या संघर्षमय 

संघर्षमय युध्दामुळे दोन्ही राष्ट्रांत राष्ट्रवाद निर्माण झाला . अशा निरनिराळया युद्धांनी वेगवेगळ्या राष्ट्रातील राष्ट्र भावना जागृत करण्याचे कार्य केले .  

ह ) परकीय राज्ये : युरोपातील काही राज��

[6/30, 18:01] Kavitq: क ) नेपल्समधील आंदोलन ( १८२० ) :  

इ . स . १८२० मधील स्पेनच्या क्रांतीचे पडसाद नेपल्स येथे उमटले . नेपल्स - सिसिलीचा राजा फर्डिनंड हा बुर्बान घराण्यातील होता . तो नेपोलियनचा तिरस्कार करणारा होता . त्याने नेपोलियनच्या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला . स्पेनमधील क्रांतीनंतर नेपल्समधील जनतेने प्रस्थापित राजा फर्डिनंड विरुद्ध आवाज उठविला . राजाकडे स्पेनच्या धर्तीवर घटना तयार करण्याची मागणी केली . जुलमी फर्डिनंड राजाने विरोध केला . परंतु क्रांतिकारकांचा जोर पाहून शेवटी त्याने नमते घेतले व उदारमतवादी घटना देण्याचे मान्य केले . १८२० मध्ये नेपल्समधील क्रांतिकारकांनी आपला पहिला लढा यशस्वी केला .परंतु लेबॅक परिषदेनंतर मेटरनिकने ऑस्ट्रियात सैन्य पाठवून नेपल्समधील उठाव दडपून टाकला . 

ड) पिडमाँटमधील क्रांती ( १८२१ ) : नेपल्समधील आंदोलनाचे लोन इटलीभर पसरू लागले . पिडमाँमाटच्या जनतेचा पहिला व्हिक्टर इमॅन्यूअलवर विश्वास होता . त्याने ऑस्ट्रियाविरुष्ट युद्ध पुकारावे असा क्रांतिकारकांचा आग्रह होता . नेपल्समधील क्रांतिकारकांनी देशभक्तांना पिडमाँटने मदत करावी असा आग्रह जनतेने धरला परंतु व्हिक्टर इमॅन्युअल पहिला याने त्यास नकार दिला . क्रांती झाली व व्हिक्टर इमॅन्यूअल पहिला याने राजत्याग केला . त्याचा भाऊ चार्लस फिलिप्स हा गादीवर आला त्याने उदारमतवादी घटना देण्याचे मान्य केले . मेटरनिकच्या प्रतिगामी राजवटीविरुध्द क्रांती चळवळ ही गतिशील बनू लागली . मेटरनिकने येथेही सैन्य पाठवून क्रांती दडपली व तेथे पुन्हा प्रतिगामी राजवट निर्माण केली . हाही इटालियन देशभक्तांचा राष्ट्रवादी प्रयत्न होता .  

इ ) १८३० व १८४८ च्या क्रांत्यांचे पडसाद : १८३० च्या फ्रेंच क्रांतीचे पडसाद इटलीतील पोपचे राज्य , पिडमाँट , चार्मा , मोदेना या राज्यात राष्ट्रवादी विचाराने प्रस्थापित सत्तेविरुद्ध जनतेने उठाव केला . मेटरनिकने ते उठाव दडपून टाकले . परंतु १८४८ च्या फ्रेंच क्रांतीची लाट मोठी होती . त्यात खुद्द आस्ट्रिया व मेटरनिकचे वर्चस्व संपुष्टात आले . १८४८ च्या क्रांतीचे पडासाद इटलीमध्ये उमटून इटालियन जनतेत खूप मोठी जागृती झाली आणि इटलीतील प्रत्येक राज्याने लढण्यापेक्षा सर्व राज्यांनी एकत्रपणे लढावे . त्यात यश येईल अशी खात्री झाली . त्यातून इटलीच्या एकीकरणाच्या चळवळीला गती मिळाली आणि राष्ट्रवादाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. 

फ ) इटलीचे एकीकरण आणि रोम इटलीची राजधानी :  

युरोपियन ख्रिस्ती जगतात रोमच्या पोपला अत्यंत महत्व होते . ख्रिस्ती जगतात रोमचा पोप धर्मगुरू होता . रोमच्या पोपचे राज्य अजूनही इटलीच्या एकीकरणात समाविष्ट झाले नव्हते . कारण पोपविरुध्द लष्करी मोहिम काढणे कठीण होते . फ्रेंच सैन्य नेपोलियन तिसऱ्याने पोपच्या संरक्षणासाठी रोममध्ये ठेवले होते . परंतु १८७० मध्ये फ्रान्स - रशिया युद्धावेळी रोममधील सैन्य रशियात हालविले . तेव्हा व्हिक्टर इम्यन्यूअल दुसरा याने रोमवर स्वारी केली . रोम ताब्यात घेतले व इटलीचे एकीकरण पूर्ण केले . रोम ही इटली या राष्ट्राची राजधानी बनविली . अशा रितीने १८१५ पासून इटलीमध्ये एक राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्रवादी भावनांनी इटालियन देशभक्तांनी इटालियन जनतेला संघटीत केले . त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच जगात राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली . युरोपमध्ये एक प्रभावशाली देश राष्ट्रवादाच्या चैतन्यामुळे अस्तित्वात आला .

[6/30, 18:01] Kavitq: इटलीचे एकीकरण- १८७० 

 

 प्रस्तावना-  

रोमन साम्राज्याच्या -हासाबरोबरच इटलीचे विघटन होऊन इटली अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला होता.अनेक राज्यात राजेशाही अस्तित्वात होती. त्यांच्यात कित्येक वर्षे संघर्ष होता.१५व्या शतकापासुन युरोपातील अनेक राष्ट्रांनी इटलीवर राज्य करण्याचा प्रयत्न केला. म्हणून इटली एक राष्ट्रही संकल्पना मुळ धरू शकत नव्हती . इटलीच्या उत्तरेला अल्फा पर्वत , तिन्ही बाजूंनी समुद्र अशी भौगोलिक सीमा लाभलेल्या इटलीला राष्ट्र बनता आले नव्हते . हे इटलीचे दुर्दैव होते . इटलीत प्रांता - प्रांतात , शहरा - शहरात , कुटुंबा- कुंटुबात आणि माणसा - माणसात वैर होत , अशा ठिकाणी एकीची भावना निर्


Sawant R., [30.06.21 21:16]

माण होणे तसे कठीणच बनले होते . त्यामध्येच इटलीतील वेगळवेगळया ठिकाणातील समाजातील रूढी , परंपरा वेगवेगळ्या लोक होत्या . 

 अ ) नेपोलियन बोनापार्टची इटली मोहीम- एक वरदान : रोमन साम्राज्याच्या -हासानंतर इटलीचे जरी विघटन झाले असले तरी प्राचीन रोमन साम्राज्याचा वैभवाचा इतिहास विसरले नव्हते . इटालियन देशभक्त होते . आपला इतिहास स्मरणारे इटालियन विद्या , विज्ञान , कला , संगीत , धर्म आदींचा अभिमान बाळगून पुन्हा एकदा आपल्या देशाला जागतिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नशील होते . ऑस्ट्रिया जर्मनी , फ्रान्स , स्पेन या राष्ट्रांचे इटलीवर वर्चस्व निर्माण झाले होते , त्यांनी स्वत : च्या स्वार्थासाठी इटलीला एक संघ होऊ दिले नाही . पुन्हा इटली एकत्र यावा किंवा राष्ट्रीय ऐक्य व्हावे या इटालियन लोकांच्या , देशभक्तांच्या स्वप्नांना नेपोलियन बोनापार्टच्या इटली मोहिमेने फार मोठा हातभार लावला . नेपोलियनच्या स्वारीने इटालियन लोकांच्यात नवे पर्व सुरू झाले . त्याने इटलीचे प्रदेश जिंकून ऑस्ट्रियाची हकालपट्टी केली . बुर्बाॅन राजांना हाकलून दिले . इटालियनांचे परकीय पारतंत्र्य घालविले व एक राष्ट्रीयत्वाची मुहूर्तमेढ रोवली . तिथे आपले एकछत्री राज्य , अंमल सुरू केला . इटलीचा राज्यकर्ता या नात्याने त्याने इटलीचा विखुरलेला प्रदेश एकत्र केला . तेथे विधानसंहिता रूजविली , दळणवळणाच्या सोयी केल्या . दळणवळणाच्या सोयीमुळे इटलीला एकत्र आणले . स्वातंत्र्य , समता , बंधुत्व या फ्रेंच तत्त्वत्रयींचा प्रसार झाला . इटलीमध्ये राष्ट्रवादी भावना वाढली . नेपोलियनची इटली मोहीम ही इटलीतील राष्ट्रवादास वरदानच ठरली .  

व्हिएन्ना परिषद व इटली [१८१४-१८१५] : नेपोलियनच्या पाडावानंतर युरोपची पुनर्रचना करण्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे युरोपियन राष्ट्रांनी १८१४-१५ मध्ये परिषद भरविली . युरोपमधील राज्यांमध्ये नेपोलियनपूर्वीची जैसे थे परिस्थिती निर्माण करण्यासाठी चर्चा सुरू झाली . मेटरनिकने इटालियन लोकांच्या भावनांचा विचार न करता इटलीची चिरफाड केली व पुन्हा इटलीत अनेक छोटी - छोटी राज्ये निर्माण केली . पुन्हा इटालियनांच्यावर पारतंत्र्य लादले . १८१५ च्या व्हिएना परिषदेने इटलीचे स्वतःचे अस्तित्व संपुष्टात आणले . परिणामी , इटालियन लोकांच्यात मेटरनिकच्या प्रतिगामी धोरणाविरुध्द असंतोष भडकू लागला आणि इटलीत राष्ट्रवादाचा उदय झाला  

 ब ) कार्बोनारी संघटना : इटलीमध्ये मेटरनिकने दडपशाहीचे घोरण राबविले . तेव्हा ऑस्ट्रियाचे वर्चस्व झुगारून देवून ऑस्ट्रियाला इटलीतून हाकलणे , इटलीचे एकीकरण करणे , इटलीला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे , हो इटालियन जनतेची भावना बळावत गेली . राष्ट्रवादी भावनेने इटालिवन देशभक्तांनी भूमिगत राहूनच स्वातंत्र्या चळवळ उभी केली . कारण मेटरनिक क्रांती चळवळी दडपण्यासाठी नेहमी सतर्क असे . म्हणून इटालियन देशभक्त नेपल्समध्ये गुप्तपणे संघटित होऊन क्रांतीकार्य किंवा एकीकरणाची चळवळ गुप्तपणे करणारी ' कार्बोनरी संघटना ' संदेश देत असे.या संघटनेने इटलीत लोकशाही स्थापणे , एकीकरण घडवून आणणे व इटली स्वतंत्र करणे हे उद्देश ठेवले होते.या संघटनेने इटलीतील एकीकरणाची चळवळ गतीमान केली.

[6/30, 18:02] Kavitq: जर्मनीचे एकीकरण-१८७०


प्रस्तावना  : युरोपियन राष्ट्रवादाच्या वाटचालीत जर्मनीच्या राष्ट्रवादी चळवळीने उल्लेखनीय कार्य केले . जर्मनी छोट्या - छोट्या राज्यात विभागला होता , अशा राज्या राज्यातून जर्मनीचा राष्ट्रवाद निर्माण झाला होता . एकीकरणाची चळवळ सुरू होऊन काही वर्षातच एक सुसंघटित व बलाढ्य जर्मनी निर्माण झाले . १८७० ते १९१४ पर्यंत जर्मनीने संपूर्ण युरोपमध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान निर्माण केले .  

अ ) जर्मनीची ऐतिहासिक पार्श्वभूमी: 

प्राचीन रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर पूर्व युरोपातील ३६० लहान मोठ्या राज्यांनी पुन्हा पवित्र रोमन साम्राज्याची स्थापना केली होती . ऑस्ट्रियन सम्राट हा या पवित्र रोमन साम्राज्याचा पदसिद्ध राजा होता . यामध्ये प्रशियाचे राज्य मोठे होते . जर्मनी हा एकीकरणापूर्वी ५ राज्यांचा एक विस्कळीत संघ होता. हे छोटे मोठे सत्ताधिश स्वत : च्या प्रदेशात जवळजवळ स्वतंत्र होते .  

ब ) नेपोलियन बोनापार्ट व जर्मनी: १८०६ मध्ये नेपोलियनने पवित्र रोमन साम्राज्यावर आक्रमण करून ३०० राज्ये 

   

राज्यात संघटित केली . त्याला -हाईनचा राज्य संघ असे नाव दिले . नेपोलियनच्या काळातच जर्मनीमधे राष्ट्रवादाच्या भावनेचा विकास होऊ लागला . जेव्हा नेपोलियन बोनापार्टने रशियावर जाचक अटी टिलसिटच्या तहामध्ये घातल्या तेव्हा प्रशियाचा स्वाभिमान जागृत झाला . याच काळात हर्डर , किश्ते , गटे , कांट व हेगेल यासारख्या जर्मन लेखकांनी राष्ट्रवादी लेखन केले . राष्ट्रवादाच्या उदयाला त्यामुळे चालना मिळाली . नेपोलियन हा या संघाचा संरक्षक बनला त्याने -हाईन राज्य संघाचा राजा म्हणून राज्य निर्माण करीत असताना समान काय


Sawant R., [30.06.21 21:16]

दा , समान न्याय , समान कर , समान प्रशासन निर्माण केले हीच समता एकराष्ट्रीयत्वास व राष्ट्रवादास कारणीभूत ठरली .  

क ) व्हिएन्ना काँग्रेस व जर्मनी : 

व्हिएन्ना परिषदेत १८१५ मध्ये पुनर्रचना करण्यासाठी जेत्या राष्ट्रांनी जर्मनीचे विघटन करण्याचा प्रयत्न केला . जर्मन एक राष्ट्र होणे या जेत्या राष्ट्रांना परवडणारे नव्हते .कारण मेटरनिकने ऑस्ट्रियाचे वर्चस्व राखण्यासाठी -हाईनचा राज्यसंघ नष्ट करून पुन्हा १८ राज्यांचा दुसरा जर्मन संघ तयार केला  या संघाचे अध्यक्षपद ऑस्ट्रियाकडे घेतले . उपाध्यक्ष प्रशियाच्या राज्याकडे नाममात्र दिले . व्हिएन्ना परिषदेने जर्मन एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेला पूर्णपणे बगल दिली . वेगळे जर्मन राष्ट्र निर्माण झाल्यास ऑस्ट्रियाकडील नेतृत्व जाईल अशी भिती मेटरनिकला होती . जर्मन राज्य संघाच्या प्रतिनिधींची फ्रैंकफूट येथे परिषद भरावी व त्याचे अध्यक्षपद ऑस्ट्रियाकडे असावे असा निर्णय घेण्यात आला . परिणामी मेटरनिकला विरोध होऊ लागला . जर्मनीच्या इच्छा , जनतेची सार्वभौम सत्ता इत्यादी गोष्टी मेटरनिकने हेतुपुरस्सर डावलल्या . व्हिएन्ना परिषदेच्या तहनाम्याने जर्मन लोकांचा अपमान झाला होता ते जर्मन रक्ताला मानवणारे नसल्याने जर्मन देशभक्तांनी त्यास विरोध केला आणि राष्ट्रबाद उदयास आला .  

ड ) जेना विद्यापीठ राष्ट्रवाद जागृतीचे केंद्र : मेटरनिकच्या प्रतिगामी धोरणास जर्मन विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापकांनी प्रथमपासून विरोध केला . त्यामध्ये जेना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व जर्मन एकीकरणाची कल्पना उचलून धरली . एकीकरणाची चळवळ सुरू केली ती दरवर्षी फोफावत गेली . १८१७ मध्ये बर्टनबर्ग विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मार्टीन ल्युथर यांची १८९ वी जयंती साजरी केली . जेना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लिपझिक लढाईचा स्मृतीदिन साजरा केला . जर्मन एकीकरण झाले पाहिजे असे यावेळी विचार मांडले . बर्टनबर्ग विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नेपोलियन संहिता पुस्तक , लष्करी राजवटीची , प्रतिगामी राजवटीची सर्व चिन्हे असलेली साहित्यांची भर रस्त्यावर होळी केली . विद्यार्थी चळवळीने केलेल्या जागृतीमुळे जेना विद्यापीठ हे राष्ट्रवादी व लोकशाही विचारांचे एक प्रमुख केंद्र बनले.

[6/30, 18:03] Kavitq: इ ) कार्लस्बाडचे वटहुकूम :  

जर्मनीतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चळवळींचा प्रसार होऊ नये व एकीकरणाची चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रशियाच्या राजाच्या सहमतीने जर्मनीतील सर्व प्रमुख राज्यांची मेटरनिकने कार्लस्बाड येथे एक परिषद बोलावली . या परिषदेत जे ठराव मेटरनिकने पास करून घेतले त्यास कार्लस्बाड वटहुकूम ( डिक्रीज ) असे म्हणतात त्यानुसार जेना विद्यापीठातील प्राध्यापकांच्यावर नजर ठेवण्यासाठी एक सरकारी अधिकारी नेमला . प्राध्यापकांना प्रक्षोभक मते मांडण्यास मज्जाव करण्यात आला . नियमांचे पालन न करणाऱ्या प्राध्यापकांना कडक शिक्षा ठोठावण्यात आल्या . विद्यार्थी संघटना पोलीस दलामार्फत मोडून टाकल्या व त्यावर बंदी आणली . विद्यापीठाची स्वायत्तता संपुष्ठात आणून विद्यापीठाचा कारभार सरकारनियुक्त अधिकाऱ्यांच्या हातात दिला . भाषण , लेखन , मुद्रण यावर बंदी घातली . जर्मनीतील राष्ट्रवादी एकराष्ट्रीयत्वाची चळवळ दडपून टाकली . यावेळी मेटरनिकने पोलीस राज्यच स्थापन करून दरारा निर्माण केला . परिणामी जर्मन लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला .  

जर्मनीची जकात संघटना - जर्मन एकराष्ट्रीयत्वाचा पाया :  

जर्मनीची जकातसंघटना ही जर्मनीच्या एकीकरणात राष्ट्रवादाप्रमाणेच पायाभूत ठरली . जर्मन हा अनेक सार्वभौम राज्यांचा बनलेला संघ होता . परंतु प्रत्येक राज्यांचे कायदे , चलन व्यवस्था जकातीचे धोरण हे वेगवेगळे होते . परिणामी जर्मनीचा आर्थिक विकास झाला नव्हता . प्रत्येक प्रांतांचे जकातविषयक धोरण वेगळे असल्याने एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात देवघेवीचा माल ( वस्तू ) पाठविण्यास अडचण निर्माण झाली होती . त्यामुळे जर्मनीचा व्यापार व उद्योगास अडथळा होत असे . यामुळे व्यापारी व भांडवलदार हे असंतुष्ट होते . १८१८ मध्ये प्रशियाच्या पुढाकाराने प्रशियाचा मंत्री मॅसेनने एक कायदा करून कच्च्या मालाच्या आयातीवरील सर्व निबंध उठविले व प्रशियाच्या मालाला संरक्षण देऊन जकात संप उभा केला . १८२९ मध्ये बव्हेरिया , सॅक्सनी ही राज्ये या संघटनेत सामील झाली . १८४२ पर्यंत ऑस्ट्रिया वगळता सर्व राज्यांनी जकात संघटनेत सहभाग घेतला . परिणामी इतरत्र विखुरलेला जर्मन प्रदेश या संघाच्या कक्षेत आला . १८४२ नंतर प्रशियाच्या नेतृत्वाखाली सर्व राज्यांचा एकत्र जकात संघ स्थापन केल्यामुळे प्रांताप्रांतात दळणवळण निर्माण झाले व आर्थिक संबंध घनिष्ट बनले . आर्थिक हितसंबंधाच्या निमित्ताने जर्मनीतील राज्ये अधिकाधिक जवळ आली  आणि जर्मनीच्या आर्थिक क्षेत्रात प्रशियाचे महत्व वाढले . यामुळे ही जकात संघटना जर्मनी एकीकरणाचा पाया ठरली .  

ई ) १८३० च्या


Sawant R., [30.06.21 21:16]

क्रांतीचे पडसाद : राष्ट्रवादी भावना दडपून टाकण्यात मेटरनिकला प्रारंभी यश आले असले तरी जर्मनीतील लोकांच्या मनातील राष्ट्रवादी भावना तो मारू शकत नव्हता त्या जर्मनीतील फिस्ते , गटे , हेगेल , कांट यासारख्या साहित्यिकांनी , तत्त्ववेत्त्यांनी जीवंत ठेवल्या होत्या . जसे १८३० च्या क्रांतीने युरोपवर परिणाम घडवून आणले तसेच जर्मनीवर ही ते घडून आले . जर्मनीतील प्रस्थापित प्रतिगामी सत्तेविरुद्ध जनतेने 

उठाव करून उदारमतवादी घटनेची मागणी केली . बुन्सविक , नास्ताऊ , हॅनोव्हर , सैक्सनी , हेसीकेंसल या राज्यातील राज्यकर्त्यांना उदारमतवादी घटना अंमलात आणावी लागली . मेटरनिकने पुन्हा आपल्या पाशवी बळाचा वापर करून सर्व चळवळी दडपून टाकल्या आणि जर्मनीत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण केली .

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Group Discussion

 (e-content developed by Dr N A Jarandikar) GROUP DISCUSSION ·          Group Discussion: Q. 3 (A) – Marks: 08 ·          Group Discussi...