Skip to main content

असंहकार चळवळीचे मूल्यमापन

(Sawant S. R.) 

बी ए भाग 2 इतिहास विभाग पेपर नंबर--6  भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे--  

असंहकार  चळवळीचे मूल्यमापन -- 

असहकार सर्वांचे मूल्यमापन करत असताना या चळवळीला पूर्णपणे यश मिळाले नाही. हे खरे असले तरी त्यातून काही गोष्टी मध्ये यश देखील प्राप्त झाले या चळवळीचे मुल्यमापन पुढील प्रमाणे करता येइल --- 

महात्मा गांधींनी असहकार चळवळ चोरा चौरी येथील घटनेमुळे थांबवली. परिणामी देशातील सर्व सर्वसामान्य जनता नेतेमंडळी त्यामध्ये सहभाग असणारा वर्ग निराश झाला. गांधीना हिंसाचार अजिबात मान्य नव्हता. परिणामी ही चळवळ थांबवली गेली. त्यानंतर गांधीजींनी भारतीय जनता आंदोलनाला प्रशिक्षित झाल्याशिवाय आणि त्याचबरोबर सत्य अहिंसा सत्याग्रह याचं योग्य आकलन झाल्याशिवाय चळवळ राबवणे चूक ठरेल असे गांधींना वाटले. त्यामुळे त्यांनी ही चळवळ तहकूब केली. दुसरे म्हणजे 

खिलाफत चळवळ  ही धार्मिक चळवळ होती .या चळवळीला पाटिबां  देणे चूक होती .परिणामी हिंदू-मुस्लीम त्यातून फारसे सख्य स्थापन झाले नाही .त्याच बरोबर ही चळवळ तुर्कस्तानच्या खलिफा विषयी होती. सहाजिकच खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे ही महात्मा गांधीजीची चूक होती. असे जनतेला वाटू लागले.त्याचबरोबर गांधींचे एक वर्षात स्वराज्य मिळवून देणे गांधीजी म्हणाले होते तसे झाले नाही .यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. पदव्या 

मान सन्मान याचा त्याग बऱ्याच लोकांनी केला नाही हा त्याग मोठ्या प्रमाणात लोकांनी केला असता तर त्याचा परिणाम निश्चितच झाला असता.परिणामी ही चळवळ अपयशाला हे एक  

कारण ठरले असले तरी देखिल असहकार चळवळ मध्ये काही उणिवा राहिल्या तरीदेखील काही उल्लेखनीय कामगिरी निश्चित झाली. ते पुढीलप्रमाणे यामध्ये राष्ट्रीय चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली आतापर्यंत फक्त शहरी मध्यमवर्ग पुरती असलेली राष्ट्रीय चळवळ खेड्यापाड्यातील पोचली.हे फार मोठे यश होते. असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात. काँग्रेस कृतिशील संघटना बनली काँग्रेस फक्त मोर्चा निवेदन हरताळ या माध्यमाचा वापर करत होती. परिणामी त्याला अपेक्षित असे यश प्राप्त होत नव्हते. संघटनात्मक मरगळ आली होती. या चळवळी मूळे राष्ट्रसभा एक कृतिशील व्यासपीठ बनले. त्यानंतर सरकार विषयी भीती नष्ट झाली सामान्य माणसांची तुरुंगवास आणि सरकार बद्दलची भीती दूर झाली हजारो लोक पोलिसांचा लाट्या काठ्या खाण्यास व तुरुंगात जाण्यास आनंदाने तयार होऊ लागले. तुरुंगातून लोक बाहेर जाईना म्हणून ब्रिटिश पोलीस भारतीयांना  बाहेर आणून सोडू लागले.आंदौलकाशी कसे वागावे हेच पोलीस व सरकारला कळेनासे झाले.हे चळवळीचे यश होते.स्वराज्य हे अंतिम ध्येय ठरले आता पयृंत सुधारणा मागणाऱ्या कॉंग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले. हा  या आंदोलनातील मोठे यश मानावे लागे या असहकार आंदोलनामुळे हिंदी जनतेत नवीन चैतन्य निर्माण होण्यास मदत झाली .

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...