Skip to main content

शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासन

 (Dr. Dhere V. D.)

B.A.I sem II   History  Paper II किल्ले प्रशासन

B.A.I sem II   History  Paper II 

शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासन.

     शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांची बांधणी दुरुस्ती व संरक्षण व्यवस्था याकडे विशेष लक्ष पुरविले होते. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, त्यांना वैभव किल्ल्यात मिळाले, त्यांनी स्वराज्याचे संरक्षण किल्ल्यांच्या द्वारे केले. किल्ल्यांच्या बारकाई बद्दल शिवाजी महाराजांचा अभ्यास खूप मोठा होता. उजाड माळ असेल आणि परचक्र आले तर प्रजा भग्न होते त्यामुळे किल्ल्यांच्या बांधण्याची गरज आहे किल्ल्याच्या अधारावर एक सशस्त्र सैनिक दहा शत्रूशी  तर दहा सैनिक 100 सैनिकांशी तर शंभर सैनिक हजारो शत्रू सैन्याची लढू शकतात. हे शिवरायांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांची डागडुजी केली अनेक ठिकाणी नवीन किल्ले बांधले तर जे किल्ले आहेत ते संरक्षण दृष्ट्या अत्यंत भक्कम बनविले. शिवाजी महाराजांच्या काळात एकही किल्ला फंद फितुरीने शत्रूच्या ताब्यात गेला नाही. याउलट शत्रूचे अनेक किल्ले जिंकून अथवा फंद फितुरीने शिवरायांनी  आपल्यात घेतले. याचे महत्वाचे कारण म्हणजे किल्ले बांधणी अथवा डागडुजी इतकेच किल्ल्यावर सैन्य व्यवस्था व इतर व्यवस्थेची कडे त्यांनी विशेष लक्ष पुरवले होते. कोणताही किल्ला जहागिरीने त्यांनी किल्लेदाराकडे सोपवला नाही. तर बाईक शिपायापासून ते किल्लेदार अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत दरमहा रोख वेतन देऊन त्यांना नोकरीत सामावून घेतले. जहागिरी पद्धतीचे दोष त्यांना पूर्ण माहिती होते. त्यामुळेच ही पद्धत न वापरता त्यांनी वेतनधारी नोकर नियुक्ती केली. राजा हाच सार्वभौम असला तरीही त्याला मदतीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले. त्यामध्ये सेनापती आणि सरलष्कर हे दोन सेनेविषयी एक अधिकारी असले तरीही राजाचा निर्णय अंतिम होता.

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची एकूण संख्या जरी निश्चित सांगता येत नसेल तरीही अंदाजे ३६०/३६५ किल्ले शिवाजी महाराजांकडे होते. यामध्ये डोंगरी किल्ले भुईकोट किल्ले आणि पाण्यातील जलदुर्ग असे विविध प्रकारचे किल्ले होते. जंगलाने व्यापली व्यापलेल्या डोंगरावर बांधलेले गिरीदुर्ग, ज्या किल्लेदाराच्या  पराक्रमाने कुणीही आक्रमणाचे धाडस करत नसलेले नरदुर्ग, आवश्‍यकतेनुसार जमिनीवर बांधलेले भुईकोट आणि सुरत मोहिमेनंतर समुद्रात उभा केलेली जलदुर्गांची रांग याबाबत स्वतः महाराज म्हणतात की, शेतकरी जसे आपल्या शेतात बांध कुंपण घालतो, कोळी जसे आपल्या तारवस खिळे मारून बळकटी आणतो त्याचप्रमाणे राज्यास बळकटी आणण्यासाठी किल्ल्यांची सभोवती माळ असायलाच हवी.

     असलेल्या किल्ल्यांना बळकट आणणे, नवे किल्ले बांधने, जिंकलेले किल्ले बळकट बनवणे या सगळ्या बरोबरच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याचे प्रशासन. कारण आपण अत्यंत कष्टाने किल्ला मजबूत बनविला किंवा नवा बांधला आणि शत्रूने सहजगत्या तो जिंकून घेतला तर आपले सर्व श्रम आणि परिसर शत्रूच्या ताब्यात जातो यामुळे किल्ल्याच्या प्रशासनाकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरविले.

किल्ले प्रशासनाची शिवरायांनी दोन भाग केले.

  बाह्य प्रशासन.आणिअंतर्गत प्रशासन.

बाह्य प्रशासन

शत्रूला सहज जिंकता येणार नाही अशा अडचणीच्या जागी व आपल्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मोक्याच्या जागी शिवरायांनी केले उभे केले. किल्ल्याच्या तटबंदी बाहेर तटसरनोबत या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीतील सैनिकांची नेमणूक केली. ज्यांना पळवाटा अडचणीच्या वाटा माहिती आहेत अशा लोकांची नेमणूक केल्याने किल्ल्यांची बाहेरील बाजू अत्यंत सुरक्षित व भक्कम बनली.

अंतर्गत प्रशासन.

किल्ला अभेद्य आहे सैन्य भरपूर आहे पण तरीही फंद फितुरीने अथवा एखाद्या अधिकार्‍याच्या चुकीने किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊ शकतो याची दक्षता घेऊन शिवरायांनी अत्यंत कौशल्याने व दूरदृष्टीने किल्ल्यावर विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. किल्ल्यावर समान दर्जाचे तीन अधिकारी नेमले १) हवालदार २) सबनीस ३) कारखानीस.

हवालदार.       किल्ल्याच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था हवालदार या अधिकाऱ्याकडे होती. हा मराठा जातीतील शूर, कर्तव्यदक्ष व स्वामीनिष्ठ अशाच व्यक्तीची नेमणूक शिवाजी महाराज करत असत. हवालदाराकडे किल्ल्याच्या चाव्या असत. किल्ल्याचे दरवाजे सूर्योदयानंतर उघडणे व सूर्यास्तापूर्वी बंद करणे. दिवसा रात्री पहारा गस्त याकडे लक्ष देणे. ही त्याची जबाबदारी होती. किल्ल्यावरील शिबंदी मेटा यांच्याकडे लक्ष पुरवणे दारुगोळा तोफा दुरुस्त आहे/ नाही ही पाहणी करणे. आवश्यकतेनुसार मागणी करणे ही त्याची कामे होती.

दर तीन वर्षांनी हवालदाराची दुसऱ्या किल्ल्यावर बदली केली जात असे.

सबनीस.           ब्राह्मण जातीतील व्यक्तीची सबनीस म्हणून निवड केली जाई. किल्ल्यावरील मुलकी जमाखर्चाचा व्यवहार पाहणे, हिशोब ठेवणे, सैनिकांची हजेरी पाहणे, आवश्यक खर्च कोणता याची माहिती देणे, आवश्यक बाबी ची मागणी करणे, आणि इतर दोन अधिकाऱ्यांच्या मागणी पत्रावर संमतीदर्शक सह्या करणे हे त्याचे काम असे.

दर चार वर्षांनी सबनीसाची दुसऱ्या किल्ल्यावर बदली केली जात असे.

कारखानीस.         प्रभू जातीतील व्यक्तीची कारखानीस म्हणून निवड केली जात असे. किल्ल्यावरील अठरा कारखाने जे आहेत त्यांचे नियंत्रण त्यांना करावे लागे. याशिवाय हवालदार व सबनीस यांच्या सोबत किल्ले प्रशासनात सहभागी व्हावे लागे. धान्यपुरवठा, दारुगोळा, किल्ल्याची डागडुजी, शस्त्रास्त्रांची साठे, निर्मिती याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही कारखानिसकडे होती. युद्धात पकडली युद्धकैदी, हत्ती, घोडे, उंट हे कारखानीसाच्या ताब्यात असत.

दर पाच वर्षांनी कारखानीसांची दुसऱ्या किल्ल्यावर बदली केली जात असे

वरील तीनही अधिकारी हे समान दर्जाचे होते. प्रत्येकाने आपल्या मागणी पत्रावर व अहवाला वर दुसऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे बंधनकारक होते.

किल्ले संरक्षणासाठी सैनिकांची व्यवस्था....

        किल्ल्यावरील सैनिकांची नेमणूक स्वतः शिवाजी महाराज पारखून करत असत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या आकारमान व गरज यावरून सैनिकांची नेमणूक केली जात असे साधारणतः 400 ते 500 सैनिक ( शिबंदी) किल्ल्यावर नेमले जात. तर दोन-तीन तटसरनौबत यांची नेमणूक केली जाई. किल्ल्याच्या तटबंदीवर या सैनिकांच्या तुकड्या ठेवत त्यांना मेट असं म्हणत तर त्या सैनिकांना मेटकरी असे म्हटले जाई.

कडक नियमावली......

   किल्ल्यासाठी चे नियम अत्यंत कडक होते.१). ठराविक कालखंडानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत.२). एकाच कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तींना अधिकारी म्हणून नेमले तर त्यांच्या नेमणुका दूरदूरच्या ठिकाणी केल्या जात ज्यायोगे ते आपसात मिळून फंदफितुरी करणार नाहीत.३) अधिकाऱ्यांनी आपल्या बायका-मुलांसह किल्ल्यावर राहणे बंधनकारक होते.४). सूर्योदयापूर्वी अथवा  सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे उघडले जात नसत.५). राजगृहाची स्वच्छता व संरक्षण करण्याची जबाबदारी हवालदारावर होती.६). हवालदाराने राजगृहाच्या बाहेर पायरीला उशी करून उषाखाली  गडाच्या किल्लया घेऊन झोपावे असा नियम होता.७). फंद फितुरी करून गेल्यास अशा व्यक्तीला कोणत्याही किमतीवर परत आणून त्याची हत्या करून त्याचे शीर भाल्याच्या टोकावर ठेवून सर्व किल्ल्यावरून फिरवले जाई.

 सैन्याची रचना पुढील प्रमाणे होती.

पाईक किंवा सैनिक. १० सैनिकावर एक नाईक

 नाईक.                     ५  नाईक  एक हवालदार

हवालदार.                ३  हवालदार एक जुमलेदार

जुमलेदार.             ७/८  जुमलेदार एक हजारी

हजारी.                     सर्व हजारीवर एक सेनापती

 सरलष्कर.       सर्व पायदळाचा प्रमुख सरलष्कर

सेनापती.      सर्व सैन्याचा प्रमुख सेनापती

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...