Skip to main content

गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग

(Sawant S. R.) 

BA  -  2 --- पेपर  -- नं -- 6 -- 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास -- महात्मा गांधीजींचे चलेजाव आंदोलन -- 

गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग 

चळवळीचा अभ्यास केला. या दोन्ही चळवळी पेक्षा चलेजाव आंदोलन चळवळ ही भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चळवळ मानले जाते. कारण या चळवळीमुळे british सत्तेला आपला भारतातील घाशा गुंडाळावा लागला. आणि भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. यानंतर आपल्याला छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी पाहावे लागेल. 1935 च्या भारतसरकारच्या कायद्या नुसार राज्याना स्वायतत्ता मिळणार होती.या स्वायत्ते मुळे1935 ला प्रांताच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमध्ये राष्ट्रसभेचे सरकार सत्तेवर आलीत. त्यानंतर  त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हुकूमशाही राष्ट्रांनी लोकशाही राष्ट्रांच्या वर दादागिरी करण्यास सुरुवात केली होती. एक प्रकारे युरोपच्या राजकारणात अशांततेचे वातावरण तयार झाले होते. परिणामी भारतातील प्रांतीय सत्त्तेची सुञे केंद्राच्या हाती गेलीत व्हाइस राॕयला   सर्वाधिकार दिले गेले. परिणामी काँग्रेसने या निर्णयाच्या धोरणात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनामध्ये मुळे देशात अशांतता निर्माण झाली. त्याच दरम्यान युरोप मध्ये 1939 ला दुसऱ्या महायुध्धास सुरुवात झाली होती.भारतात अशांतता होती या अशा परिस्थितीत  मार्ग काढण्यासाठी 8 ऑगस्ट 1940 रोजी व्हाइसरॉयने ऑगस्ट घोषणा केली. त्यामध्ये काही आश्वासने भारतीयांना दिली गेली. मात्र यामुळे भारती यांचे समाधान झाले नाही. साहजिकच महात्मा गांधीजींनी 1940 मध्ये मुंबईमध्ये राष्टीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव पास करून घेतला आणि  त्यानंतर देशात  गांधीजींच्या आदेशावरून वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली .यातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्टे फर्ड क्लिप्स या मंत्र्याला मार्च 1942 मध्ये भारतात पाठवले. त्याने सुधारित  योजना जाहीर केली. मात्र त्यामुळे भारतीयांचे अजिबात समाधान झाले नाही.त्या मुळे भारता मध्ये असतोषाची  परिस्थिती तयार झाली होती. 

परिणामी सुधारित क्रिप्स योजना राष्ट्र सभेने फेटाळून लावली. दरम्यान  ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण त्याचबरोबर सरकारची भारतीयांच्या  वर चालवलेली दडपशाही दुसऱ्या बाजूला   जपानने आक्रमक धोरणाचा स्वीकार करून जपान हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकला होता. जो इंग्लंड स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तो हिंदुस्तानचे काय संरक्षण करणार हे गांधीजींनी ओळखले त्यामुळे  

महात्मा गांधीनी निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सात ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबई मध्ये भरले. होते. या अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत हा ऐतिहासिक ठराव प्रचंड मतानुसार  मान्य केला गेला. आणि त्यावेळी गांधीजीनी आम्ही आता अधिक काळ शांत राहू शकत नाही गुलामगिरीत राहू शकत नाही त्यासाठी सर्वशक्तीनिशी सरकारच्या  विरोधात लढा द्या मी तुम्हाला छोटा मंत्र देतो तो मंत्र म्हणजे करा अथवा मरा ही घोषणा करून संपूर्ण देशाला गांधीजींनी  चले जाव आंदोलनाची घोषणा केली. आणि संपूर्ण देश या चळवळीने पेटून उठला भारतामध्ये चलो जो आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षपणे सुरुवात झाली

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...