Monday, 21 June 2021

लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ

 (Sawant S. R.)

बीए भाग 2--- इतिहास-- पेपर नंबर--6

लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ 

 ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजसत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या गरजे साठी म्हणून ख्रिश्चन मिशनरी यांच्यामार्फत इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा इंग्रजांचा एकच उद्देश होता , की इंग्रजांना आपल्या कार्यालयातील हलकी कामे भारतीयांच्या कडून करून घेता येतील , याच्यासाठी हिंदी लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र हे शिक्षण टिळकांच्या मतानुसार कारकून बनवणाऱ्या य लायकीचे होते. त्यामुळे टिळकांनी इंग्रजी शिक्षणावर टीका करण्यास सुरुवात केली.  भारतीयांनी संशोधक, शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , उद्योगपती, कारखानदार, बनावे, असे टिळकांचे मत होते, परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची शिक्षण व्यवस्था नव्हती. त्यामुळे भारतीयांनी पुढे येऊन सरकारी अनुदानाच्या जोरावर शिक्षण व्यवस्था न काढता, पदरमोड करून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, काढावीत, आणि देश औद्योगिक दृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या कसा प्रगत होईल असे शिक्षण तिथे दिले जावे, परिणामी टिळकांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी चळवळ सुरू झाली . त्यामुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्यास मदत झाली.  परिणाम असा झाला की  भारतीय तरुण , नवीन शिक्षण घेऊन पुढे येऊ लागला.  स्वतःच्या पायावर तो उभा राहू लागला. प्रगती करणारा भारतीय तरुण पुढे आला , हेच टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे उद्देश होते ,  त्यामुळेच टिळकांची राष्ट्रीय शिक्षण चळवळ वाढीस लागली.

टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण चळवळ व्यवस्थेतून प्रेरणा घेऊन, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. 1906  बंगालमध्ये बंगाल हे राष्ट्रीय कॉलेज स्थापन केले, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले गेले,  महाराष्ट्रा  भारतीय भाषांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला , पुण्यामध्ये चिपळूणकर टिळक आगरकर यांनी, डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. पंजाबात आर्य समाजाने शैक्षणिक कार्य चालवले. बंगालमध्ये तीन वर्षात 300 प्राथमिक 25 माध्यमिक राष्ट्रीय शाळा सुरू केल्या गेल्या, अनेक देशभक्त व समाजसेवकांनी लोकवर्गणी जमा करून अनेक ठिकाणे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. परिणाम  भारतीय  मुले असे या शिक्षण संस्थांमधून  विद्वत्तेचे धडे घेऊ लागले. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय प्रेरणा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. आणि यातूनच भारतीय राष्ट्रीय  स्वातंत्र्य चळवळ गतिमान होण्यास मदत झाली.  लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान होते.बीए भाग 2--- इतिहास-- पेपर नंबर--6---- लोकमान्य टिळक राष्ट्रीय शिक्षण --- ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजसत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या गरजे साठी म्हणून ख्रिश्चन मिशनरी यांच्यामार्फत इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा इंग्रजांचा एकच उद्देश होता , की इंग्रजांना आपल्या कार्यालयातील हलकी कामे भारतीयांच्या कडून करून घेता येतील , याच्यासाठी हिंदी लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र हे शिक्षण टिळकांच्या मतानुसार कारकून बनवणाऱ्या य लायकीचे होते. त्यामुळे टिळकांनी इंग्रजी शिक्षणावर टीका करण्यास सुरुवात केली.  भारतीयांनी संशोधक, शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , उद्योगपती, कारखानदार, बनावे, असे टिळकांचे मत होते, परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची शिक्षण व्यवस्था नव्हती. त्यामुळे भारतीयांनी पुढे येऊन सरकारी अनुदानाच्या जोरावर शिक्षण व्यवस्था न काढता, पदरमोड करून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, काढावीत, आणि देश औद्योगिक दृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या कसा प्रगत होईल असे शिक्षण तिथे दिले जावे, परिणामी टिळकांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी चळवळ सुरू झाली . त्यामुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्यास मदत झाली.  परिणाम असा झाला की  भारतीय तरुण , नवीन शिक्षण घेऊन पुढे येऊ लागला.  स्वतःच्या पायावर तो उभा राहू लागला. प्रगती करणारा भारतीय तरुण पुढे आला , हेच टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे उद्देश होते ,  त्यामुळेच टिळकांची राष्ट्रीय शिक्षण चळवळ वाढीस लागली.

टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण चळवळ व्यवस्थेतून प्रेरणा घेऊन, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. 1906  बंगालमध्ये बंगाल हे राष्ट्रीय कॉलेज स्थापन केले, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले गेले,  महाराष्ट्रा  भारतीय भाषांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला , पुण्यामध्ये चिपळूणकर टिळक आगरकर यांनी, डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. पंजाबात आर्य समाजाने शैक्षणिक कार्य चालवले. बंगालमध्ये तीन वर्षात 300 प्राथमिक 25 माध्यमिक राष्ट्रीय शाळा सुरू कल्या गेल्या, अनेक देशभक्त व समाजसेवकांनी लोकवर्गणी जमा करून अनेक ठिकाणे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. परिणाम  भारतीय  मुले असे या शिक्षण संस्थांमधून  विद्वत्तेचे धडे घेऊ लागले. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय प्रेरणा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. आणि यातूनच भारतीय राष्ट्रीय  स्वातंत्र्य चळवळ गतिमान होण्यास मदत झाली.  लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान होते.

महाराष्ट्रातील कृषी विकासातील मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे योगदान

( Dhere V. D.)

B.A.II Sem. III History Paper IV

महाराष्ट्रातील कृषी विकासातील मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे योगदान.

 महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांचा आहे ते मूळचे शेती व्यवसायिक असल्यामुळे त्यांनी शेतीला प्रतिष्ठा लाभली पाहिजे या उद्देशाने अनेक विकासात्मक निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना कृषी सुधारक, कृषी कल्याण, गोरगरीब दलितांसाठी वस्तगृह काढणारे, हरितक्रांतीचे प्रणेते, कृषी विषयक अनेक संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी म्हणजे 1 मे 1960 ते 4 डिसेंबर 1963 ते  पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 इतकी होती. त्यांचा जन्मदिवस 1 जुलै हा महाराष्ट्रात "कृषी दिन" म्हणून साजरा केला जातो. ' राज्य जनतेचे आहे जनतेच्या कल्याणासाठी जे- जे करणे आवश्यक आहे ते- ते शासनाने केले पाहिजे' ही वसंतराव नाईक यांची धारणा होती.

त्यांनी घेतलेले ठळक निर्णय  पुढीलप्रमाणे होते.

  पंचायत राज्य संकल्पनेचे प्रभावी अंमलबजावणी. कापूस एकाधिकार योजना. रोजगार हमी योजना. (१९६७)कोयना भूकंपग्रस्तांना मदत व पुनर्वसन. पानशेत धरण फुटी मुळे बेघर झालेल्या 70 हजार लोकांना घरे बांधून दिली. (१९७०) भिवंडी शहरात झालेल्या जातीय दंगली तील अपदग्रस्ताना तात्काळ मदत. विधानसभा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते त्याला' कॅबिनेट मंत्री' पदाचा दर्जा.(१९७२) दुष्काळग्रस्तांना पाणी टंचाई, चारा टंचाई यावर मात करण्यासाठी चे विविध निर्णय. मार्केटिंग फेडरेशन मार्फत ज्वारीची खरेदी. शेती नियोजन व  बियाणे निर्मितीसाठी चार कृषी विद्यापीठांची स्थापना. जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना.


वसंतराव नाईक यांची कृषी विकासातील योगदान.

मा. वसंतराव नाईक हे द्विभाषिक मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात 11 एप्रिल 1957 ते 30 एप्रिल 1960 कृषिमंत्री होते. 1 मे 1960 ते 4 डिसेंबर 1963 पहिल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते पुन्हा कृषिमंत्री होते. तर 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 म्हणजे अकरा वर्ष दोन महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

"महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी घेईन."या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांची कृषिविषयक तळमळ दिसून येते. त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदान पुढील प्रमाणे.

१). शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना.

                    पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती केली पाहिजे यासाठी "तुम्ही कष्ट करा मी साधने पुरवतो" या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी महाराष्ट्राच्या शेतीच्या आधुनिकीकरणाचे प्रयत्न केले. आधुनिक बी-बियाणे, खते वापरण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे काढले.

२). हरितक्रांतीचे प्रणेते.(विविध उपक्रम)

                यशवंतराव चव्हाण डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रात हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. तिचे रूपांतर क्रांतीमध्ये करण्यासाठी वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना बांधापर्यंत बी -बियाणे पोहोचवले. शेणखत याबरोबरच रासायनिक खताचा वापर, मोठ्या प्रमाणावर व शास्त्रशुद्ध पद्धतीने शास्त्रीय तंत्रज्ञानाच्या वापरानुसार जमिनीच्या प्रतवारी नुसार जल व्यवस्थापन करावे, दूध व्यवसाय वाढावा यासाठी बहुउद्देशीय कार्यक्रम हाती घेतले. दर हेक्टरी शेती उत्पादन वाढवले गेले. नदी नाल्यातून जाणाऱ्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून दुबार पिके घेतली गेली. त्यासाठी "पाणी आडवा पाणी जिरवा" ही मोहिम राबविण्यात आली. शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच मजुरांना योग्य मजुरी मिळावी यासाठी शेतमालाच्या आधारभूत किमतीचे धोरण ठरविण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला.

३). ज्वारी खरेदीची एकाधिकार योजना.

            ग्राहकांना कमीत कमी किमतीत अन्नधान्य मिळाली पाहिजे. ही भूमिका तत्कालीन सरकारची होती. पण शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाले तरच त्यांच्यामध्ये अधिक उत्पादनाची प्रेरणा निर्माण होईल व यामधून हरित क्रांतीला हातभार लागेल असे नाईक यांनी स्पष्ट केले.९ऑक्टोबर१९६४ रोजी त्यांनी ज्वारी खरेदीचा हक्क फक्त सरकारकडेच राहील असे जाहीर केले. ज्वारी चा दर बाजारात पडलेला होता यावेळी त्यांनी ज्वारी गहू तांदूळ व इतर गाण्यांचे दर निश्चित केले आणि खाजगी खरेदीदारांना ज्वारी हे खाद्यान्न खरेदी करता येणार नाही. असे जाहीर केले. मार्केटिंग फेडरेशन तर्फे सहकारी बँकेने सरकारच्या परवानगीने ज्वारी खरेदी करावी व वितरित करावी. असे धोरण त्यांनी राबविले. त्यामुळे ज्वारीचे आधारभूत किंमत वाढली.९ऑक्टोबर१९६४ रोजी त्यांनी ज्वारी व भात एकाधिकार खरेदी योजना जाहीर केली.

४). चार कलमी शेती उत्पादन व अन्नधान्य स्वयंपूर्ण योजना.

    अ. पाण्याच्या थेंबाचा कसोशने वापर करणे.

     ब. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारलेल्या बियाण्यांचा वापर करणे.

     क. रासायनिक खते वापरणे.

      ड. पिकांचे रोग व किडी पासून संरक्षण करणे.

 वरील पद्धतीचा वापर करून अन्नधान्य, दूध-दुभते, खेड्यांमधील उद्योग वाढवणे, शेती बागायती करणे, शेतीमध्ये दरडोई व दर एकरी उत्पादन वाढवणे हे धोरण स्वीकारले. 13 ऑक्टोबर 1962 रोजी पुण्यातील शनिवार वाड्यासमोर त्यांनी" दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला नाही तर मला शनिवार वाड्यासमोर फाशी द्या" अशी  प्रतिज्ञा केली.

 ५). बारा कलमी अन्नधान्य विशेष धडाडीची योजना.

      अ . प्रवरा व गोदावरी नद्यांच्या कालव्यातील पाणी उसाऐवजी रब्बी हंगामातील अन्नधान्य पिकविण्यासाठी वापरणे.

  आ. इरिगेशन ब्लॉक व बाहेरील रब्बी हंगामातील अन्नधान्य या पिकांना, गव्हाला दुसऱ्या पिकास  पाण्याचा मोफत पुरवठा करणे.

    इ. मोफत पाणी शासकीय योजनेचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून  शेतीसाठी मोफत पाण्याची सोय करणे.

     ई . उरमोडी, तारळी तसेच इतर बंधाऱ्यातील सिंचन पद्धतीने हंगामी पिकांसाठी पाणी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ पाणी परवानगी देणे.

  उ . पाणी कालव्यांना चऱ्या बांधण्याची मोहीम हाती घेणे त्यासाठी जनतेचे सहकार्य घेणे.

   ऊ . हिवाळी ऊसाची लागण करताना ऊसाखालील जमीन १० टक्‍क्‍यांनी कमी करून इतर अन्नधान्य खाली आणणे.

     ए . पिकांना सिंचनासाठी कालव्याचे पाणी देताना खरीप व रब्बी हंगामात 18 दिवसाची तर उन्हाळी पिकासाठी 14 दिवसाची पाळी असेल.

   ऐ . खरीप पिकांना कालव्याचे पाणी मोफत देण्यात येईल.

   ओ . नाशिक जिल्हा वगळता सर्व बंधार्‍यातून सर्व नद्या व उपनद्या नाले यांचे पाणी सिंचन पद्धतीने घ्यावे यासाठी परवानगी लागणार नाही पण हे पाणी आणण्यासाठी वापरले पाहिजे ही सक्ती राहील.

   औ . महाराष्ट्र विदर्भ व इतर भागात तलावातील पाणी पुढील हंगामासाठी काही प्रमाणात राखून ठेवण्यात येईल पण रब्बी हंगामातील पिकासाठी या वर्षीही वापरता येईल. सोलापुरातील संग तलावातील पाणी अठरा महिने पुरेल या बेतानेच वापरावे.

    अं . तलावातील पाणी ऑटो लागल्यावर उघडा होणाऱ्या गाळजमीनी शेतकऱ्यांना ताबडतोब खंडाने देण्यात येतील असा हुकूम जिल्हा कलेक्टर व एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर ला देण्यात यावा.

   अः .  वर्धा जिल्ह्यातील बोर नदीवरील धरण अपूर्ण आहे त्यातील पाणी सिंचन पद्धतीने कालव्यात सोडण्यात येईल शेतकऱ्यांनी अडवून हे पाणी पिकासाठी वापरावे.

    अशा रीतीने बारा कलमी धडाडीची शेती उत्पादन विकास योजना त्यांनी राबविली.

 ६). संकरित पिकांच्या प्रगतीला प्रोत्साहन.

     अधिक उत्पादन देणारे संकरित वाण महाराष्ट्रभर वापरले पाहिजेत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. हायब्रीड ज्वारी मका गहू कापूस बियाणे वापरण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

 ७).  कृषी विद्यापीठांची निर्मिती.

       जमिनीचा पोत, सकसता यांचा विचार करून कोणती बि-  बियाणी शेतीसाठी वापरावी, नव्या जाती शोधाव्या मातीचा पोत सुधारावा यासाठी कृषी विद्यापीठाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी राहुरी येथे 29 मार्च 1968 रोजी पहिले कृषी विद्यापीठ स्थापन केले. जांबुवंतराव धोटे यांनी आपल्या विदर्भात कृषी विद्यापीठात विद्यापीठ स्थापन करावी यासाठी आंदोलन सुरू केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोल्यात करण्यात आली. यानंतर पुणे व दापोली येथे कृषी विद्यापीठे स्थापन करण्यात आली. कृषी क्षेत्रात संशोधन, अध्यापन, आणि कृषी सेवा. ही त्रिसूत्री राबविण्यात आली. अशा रीतीने वसंतराव नाईक यांनी चार कृषी विद्यापीठे स्थापन केली.

 ८). रोजगार हमी योजना.

     विधान परिषदेच्या अध्यक्षा असणाऱ्या वि.स. पागे यांनी

शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, छोटे- छोटे जमीनदार इत्यादींसाठी महत्त्वपूर्ण अशी रोजगार हमी योजना मांडली.

मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ही योजना उचलून धरले व गवई सारख्या अभ्यासकाला त्यावर अभ्यास करण्यास सांगितले. व तिचा स्वीकार केला. या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे १). मागेल त्याला काम.२). सर्व धडधाकट स्त्री-पुरुषांना उत्पादक व उपयुक्त काम धंदा मिळवून देणे.३). जनतेतील दारिद्र्याची निर्मूलन करणे.४). छोट्या शेतकरी कुटुंबांना मोठ्या शेतकऱ्यांबरोबर स्पर्धा करण्याची आर्थिक क्षमता निर्माण करणे.

     रोजगार हमी योजना पुरोगामी महाराष्ट्राला वरदान ठरली. दुष्काळी भागात सुद्धा जमीन सपाटीकरण, रस्तेबांधणी, पाझर तलाव, साठवण तलाव, विहिर खुदाई इत्यादी कामे यातून उभी राहिली. महाराष्ट्राची योजना केंद्र सरकारने जशीच्यातशी देशपातळीवर सुरू केली. हे या योजनेचे यश होय.

 ९). कापूस एकाधिकार योजना.

          १ ऑगस्ट १९७२ रोजी वसंतराव नाईक यांनी "कापूस एकाधिकार योजना" जाहीर केली. कापूस उत्पादक शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे याची जाणीव ठेवून ही योजना राबविण्यात आली. कापूस खरेदीदार रडते दलाल यांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका करून कापसाला हमी भाव देण्यात आला शिवाय लाभांशही देण्यात आला.

१०). श्वेत क्रांती. (दूध विकास)

        शेती व्यवसायाला पूरक उद्योगाची जोड दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शेती किफायतशीर ठरणार नाही. याचा विचार करून महाराष्ट्रात श्वेतक्रांती घडवून आणण्यासाठी वसंतराव नाईक यांनी विशेष प्रयत्न केले. पारंपारिक म्हशी पेक्षा संकरित गाई द्वारे अधिक दूध उत्पादन करता येणे शक्य आहे. त्यांच्या प्रजननासाठी काय करता येईल याचा विचार करून हरियानातील कर्नाल येथील राष्ट्रीय दूध व्यवसाय संशोधन संस्थेचे तज्ञ संचालक डॉ. सुंदरेशन यांच्या संशोधनावर आधारित महाराष्ट्रात गाई-म्हशींना सकस आहार व दूध उत्पादनासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.

११). फलोत्पादन.  

       वसंतराव नाईक यांनी शेतातील अन्नधान्य उत्पादनाबरोबरच फलोत्पादनास विशेष प्रोत्साहन दिले. द्राक्षाच्या नवीन जाती वापरण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या मांडवाच्या रचना वापरण्यास शासकीय अनुदान देण्यात आले. "आनाबेशाही"उत्तम प्रतीच्या द्राक्षवानाची यातून निर्मिती झाली. शेतकरी फायदा त्याला दुबार पीक यामुळेही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

        देशातील वीर जवानांना ज्याप्रमाणे "वीर चक्र" "परमवीर चक्र" अशी बक्षिसे देऊन सन्मान केला जातो तसाच शेतकऱ्यांचाही "कृषिभूषण" सन्मान व्हावा ही विचारसरणी नाईक साहेबांनी मांडली होती.

लोकमान्य टिळक व स्वदेशी, चळवळ

 बीए भाग ---  2--- इतिहास पेपर नंबर-- 6  

लोकमान्य टिळक व स्वदेशी, चळवळ

 राष्ट्रसभेच्या पहिल्या कालखंडात मवाळवादी वर्चस्व मुळे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांना आपले चतुर धोरण राबवता आले नाही. तरीही अन्या मार्ग आणि पर्याय या माध्यमातून आपले जहालवादी धोरण जनतेपर्यंत पोहोचविण्याचे धोरण टिळकांनी आखले.हे धोरण म्हणजे स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व स्वातंत्र्य यामध्ये. स्वदेशी आणि बहिष्कार हे दोन मार्ग असे होते .त्यामध्ये स्वदेशी म्हणजे भारतीय लोकांनी आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करावा, म्हणजेच स्वदेशी उद्योगांना चालना मिळून भारतीय उद्योग मोठ्या प्रमाणात चालतील त्यामुळे बेकारीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यास मदत होईल तसेच लोकांच्याकडे  पैसेदेखील येतील परिणामी लोकांना मदत होण्यास मदत होईल. आणि या माध्यमातून आपण विलायती कपड्यावर एक मार्गे बहिष्कार टाकू शकू. हा टिळकांना आत्मविश्वास होता.  म्हणून त्यांनी व्यापक दृष्टीने स्वदेशीचा आग्रह धरला एक राजकीय चळवळ म्हणून त्यांनी स्वदेशी कडे पाहिले. यातून स्वराज्य मिळवणे हेच ध्येय अंतिम ठरले,

 खेड्यातील शेतकऱ्यांना हाताशी धरून, अन्यायाविरुद्ध कायदेशीर प्रतिकार चळवळ चालवली. टिळकांनी यामध्ये सहभागी होऊन सरकार विरोधात प्रतिकारासाठी ग्रामीण आणि शहरी शहरी भागातील लोकांचे संघटन करण्यास सुरुवात केली. यावेळी सरकारने तलम कापड या ला जकात दर कमी केला आणि गरीब लोक जे जाडेभरडे कापड कापड वापरत होते.. त्याच्यावर साडेतीन टक्के नवीन कर बसवला. त्यामुळे  श्रीमंता वरील कराचे ओझे गरिबावर बसवले गेले. तेव्हा टिळकांनी संघटितपणे सरकारच्या या धोरणाला लोकांनी विरोध करावा, त्याच बरोबर लोकांनी देशी कापड वापरावयास सुरुवात करावी. मुंबईच्या सभेत सेट वसंत जी खिमजी यांनी अशीच सूचना केली . ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सभा घेऊन , देशी कापड वापरण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की  देशी कापडाचे अनुकरण सर्व लोक करू लागले. त्याच बरोबर लोकांची संघटित शक्ती तयार होऊ लागली . परिणामी टिळकांनी स्वदेशीचे  महत्व लोकांना सांगण्यात ते यशस्वी झाले . यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन स्वदेशीच्या  महत्त्व लोकांच्यात पसरू लागले.

यावेळी राष्ट्र राष्ट्रसभेचे एक नेते दिनेश वाच्छां यांनी टिळकांच्या स्वदेशी बहिष्कार चळवळी व अनेक आक्षेप घेतले ही चळवळ म्हणजे लांब पल्ल्याची असून त्याला यश येणे अशक्य आहे. असे म्हटले असे असले तरी लोक मान्य यांनी  स्वदेशी चळवळीचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. या चळवळीमुळे देशी उत्पादनात वाढ झाली लोक स्वदेशीचा स्वीकार करू लागले. परिणामी भारतीय लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली . 

 सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा. स्वदेशी मालाच्या वापरास प्रोत्साहन द्यायचे असे चळवळीचे स्वरूप होते. या चळवळीला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. स्वदेशात बनवलेली कापड वापरावयास अनेकांनी सुरुवात केली. बरोबर परदेशी मालावर बहिष्कार टाकून त्या वस्तूंचा जागोजागी एका ठिकाणी घेऊन त्याची होळी करण्यात येऊ लागली. यामुळे खाद्य वस्तू तयार करणाऱ्या व्यवसायिकांनी विलायती साखर न वापरण्याची प्रतिज्ञा केली लोकांनी विलायची कपडे धुने बंद केली. महिलांनी बांगड्या व काचेच्या वस्तू वापरणे बंद केले. विद्यार्थ्यांनी विलायती कागद न वापरण्याचे ठरवले. व्यापार्‍यानी परदेशी कापडाचा व्यवसाय बंद केला या वेळेला सरकारने या मंडळीला मोठ्या प्रमाणात त्रास दिला असे असले तरी लोकांनी कशी चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवून आपले स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दाखवून दिले . रवींद्रनाथ टागोर यांनी  स्वदेशी वस्तू भांडार सुरू केले . टाटा कंपनी ला लोकांनी आर्थिक मदत केली भांडवलदारांनी बँका विमा कंपन्या काढल्या. देशी लोकांनी वाहतूक व्यवसाय सुरू केले. यातूनच साहित्य निर्मितीला चालना मिळाली. अनेक लेखक कवी यातून निर्माण झाले एकंदरीत टिळकांनी  नी  सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीचा परिणाम.भारतीय स्वातंत्र्य चळवळी वर मोठ्या म् प्रमाणात झाला.

मराठ्यांचे आरमार

 मराठ्यांचे आरमार

B.A.I.Paper II History

मराठ्यांचे आरमार

      भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. मध्ययुगात भारताने भारतातील कोणत्याही सत्ताधीशांनी आरमार उभारण्याचा प्रयत्न केला नाही पण शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय आरमाराची स्थापना केली. हे त्यांच्या दूरदृष्टीचे व मुत्सद्दीपणाची उदाहरण होय. स्वराज्य विस्तार करताना जावळीच्या मोर्‍यांना जिंकल्यानंतर स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत पोहोचली आणि शिवाजी महाराजांच्या लक्षातही आले की, युरोपियनची समुद्रावर सत्ता आहे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्धी  यांच्या ताब्यात सर्व समुद्रकिनारा आहे. तो जर आपला समुद्रकिनारा आपल्या ताब्यात ठेवायचा असेल तर आरमार निर्मिती केली पाहिजे. स्वराज्याला असलेल्या परकीय सत्ता  पासून चा धोका आपणास जर नष्ट करावयाचा असेल तर आरमार निर्मिती व सागरी किल्ले निर्मिती केली पाहिजे. कोकण जिंकल्यानंतर शिवरायांना सिद्धीचा सातत्याने त्रास जाणवू लागला. तर गोवेकर पोर्तुगीज  समुद्रात जहाजे फिरवावी याचे असतील तर आम्हास दस्तक द्यावा लागेल असेच जाहीर केले.  युद्धासाठी आणि देशांतर्गत व्यापार साठी शिवरायांनी जहाजबांधणीचे उद्योगाला सुरुवात केली कोकण किनारपट्टीवरील कोळी भंडारी या दर्यावर्दी जमातींचा त्यासाठी वापर करून घेतला कोकणात सागाचे लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचा वापर या जहाज बांधण्यासाठी करण्यात आला भारतीयांकडे युरोपियन साठी मोठी जहाजे ही नव्हती व तसे तंत्रज्ञान ही मराठ्यांना अवगत नव्हते. त्यामुळे त्यांनी लहान-लहान जहाज बांधणीला सुरुवात केली. आणि नंतर गोवेकर पोर्तुगीज तंत्रज्ञाना कामावर ठेवून त्यांच्या हाताखाली आपल्याकडील लोहार सुतार या कारागीर जमातींना देऊन आपला जहाज बांधणीचा उद्देश सफल केला.

छत्रपती शिवाजी महाराजांकडे पुढील प्रकारची जहाजे होती.

गुराबा, मायावा, पगार, तरांडी, शिबाड, तीरकारी, तारू, गलबत,मचवा, पाल,जुग.

शिवरायांच्या आरमारात 'गुराब' हे ३०० टन वजनाचे दोन डोल काट्या असणारे सगळ्यात मोठे जहाज होते.

त्याखालोखाल 70 टन वजनाचे सहा ते सात डोल काट्या आसणारे गलबत हे जहाज होते. डोल काड्यांची संख्या, वजन, आकार, त्यावरील तोफांची संख्या यावरून जहाजाचे प्रकार पाडले जात. मराठ्यांच्या आरमाराची संख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहे. होड्या 160, महागिरी 150, गलबत 100, मचवे 50, लहान गुराब 50, तारू 60 गुराब 30, पाल 25, जुग 15.

आरमार दलाचे प्रशासन.     

        आरमाराच्या प्रमुखाला दर्यासारंग /सरखेल या नावाने ओळखले जात असे. त्याच्या हाताखाली दुय्यम अधिकारी म्हणून मायनाईक नेमलेला असे. आरमाराचे अनेक सुभे केलेले असत एका सुभ्यात 5 गुराब 15 गलबते व इतर काही जहाज असत. कथा आपल्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणे शत्रूच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करणे आपल्या व्यापाराचे रक्षण करणे ही प्रमुख कामे केली जात. शिवरायांनी आरमाराच्या जोरावर मोहीम काढल्याचे दाखले मिळतात. आरमारला वावरता यावे यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जलदुर्गांची एक साखळी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या सागरी सत्ता व परकीय व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या आरमाराचा मराठ्यांना मोठा उपयोग झाला.

भाषाविज्ञान की वैज्ञानिकता


T. Y. B. A., HINDI  , Paper no -16 , semester - 06                          

भाषाविज्ञान की वैज्ञानिकता 


भाषाविज्ञान की वैज्ञानिकता पर विचार करने के पूर्व विज्ञान तथा कला की विशेषताओं पर एक नज़र डालकर उसके आधार पर हम यह देखने की कोशिश करेंगे कि भाषाविज्ञान विज्ञान है या कला ? और अगर वह विज्ञान है तो क्यों और किस सीमा तक विज्ञान है? निम्न मुद्दों में इसे आसानी से स्पष्ट किया जा सकता है।


1) विज्ञान की विशेषताएँ


"किसी भी वस्तु का विशिष्ट अथवा युक्तिसहित ज्ञान प्राप्त करना ही विज्ञान है।" विज्ञान अपने आप में कोई विषय नहीं, बल्कि एक दृष्टि है, ज्ञान की विशिष्ट पद्धति है। 'विज्ञान' शब्द अंग्रेजी के साईस (Science) का पर्याय है। उसका मूल अर्थ True Knowledge होता है। याने विज्ञान का ज्ञान सत्य, ध्रुव निश्चय तथा अटल सत्य होता है । समुचित रूप में विज्ञान का अर्थ किसी वस्तु का सम्यक परीक्षण करना, कारणों का पता लगाना, तुलना करना तथा प्रयोग के द्वारा सिद्धान्त निश्चित करना है।


उसी ज्ञान को विज्ञान कहते हैं, जिसमें विकल्प की गुंजाईश नहीं होती, मन की स्थिति विकल्प रहीत हो जाती है। जैसे अमुक कारण हो तो अमुक कार्य होगा ही। ।


विज्ञान के नियम और सत्य सर्व देशव्यापी और सर्व कालव्यापी (सार्वदेशिक और सार्वकालिक) होते हैं । उदा. पृथ्वी की गुरुत्वाकर्षण शक्ति का नियम भारत तथा यूरोप में समान रूप से लागू होता है। तथा पृथ्वी सूर्य क चारों ओर चक्कर लगाती है तथ्य सब कालों में एक ही रहेगा। मतलब विज्ञान के मूलतत्त्व सर्वत्र समान लागू होते हैं।विज्ञान की दृष्टि विश्लेषणात्मक होती है। विज्ञान का उद्देश्य ज्ञानार्जन होता है। विज्ञान केवल सिद्धान्तों का प्रतिपादन करता है। सत्य का अन्वेषण करता है। और भौतिक सत्य को प्रस्थापित करता है। विज्ञान में निश्चयात्मकता होती है। वैज्ञानिक अध्ययन में समान सामग्री से समान निर्णय निकलना संभव है।


वैज्ञानिक अध्ययन का उद्देश्य केवल उत्कंठा की तृप्ति होता है। इस दृष्टि से विज्ञान के लिए विषय साध्य होता है। वह ईश्वर या प्रकृति की कृतियों का विश्लेषण करता है, मानवीय कृतियों का नहीं । विज्ञान सामग्री प्रधान विषय है। इसमें व्यक्तिगत रूचियों का कोई स्थान नहीं। विज्ञान शुष्क होता है। विज्ञान के निर्मित नियम तात्त्विक दृष्टि से अपवाद रहित होते हैं। कारण ये नियम तथा निष्कर्ष वृद्धि के द्वारा किए गए सूक्ष्म प्रयोगों से निश्चित किए जाते हैं।


2.कला की विशेषताएँ -


कला विज्ञान से भिन्न है। कला के मानदण्ड देश-काल के अनुसार परिवर्तित होते हैं। कला में व्यक्ति की अभिरूचि का याने वैयक्तिकता का बड़ा हाथ रहता है। मतलब कला व्यक्तिनिष्ठ एवं तद्नुसार विशिष्ट है। कला में यह निर्धारित नहीं किया जा सकता कि अमुक तत्वों के संयोग से अमुक प्रकार की कला का उद्भव होता है। कला सौंदर्यानुभूति पर प्रतिष्ठित होती है। विज्ञान और कला के सत्य में अंतर होता है। कला का उद्देश्य मनोरंजन होता है। वह उपयोगी भी होती है।


कला में भाव को महत्व मिलता है और वह व्यक्ति की अभिव्यक्ति बन जाता है। वह मानव स्वभाव के अनेक पहलुओं को देखकर मानव के भावना जगत् के सत्य का उद्घाटन करती है। कला रचनात्मक होती है। कला में सामान्य नियमों का निर्धारण नहीं होता। जो नियम बनाए जाते हैं, उसमें अनेक अपवाद होते हैं। कला का संबंध हृदय से है। अतः वृद्धि की अपेक्षा भावना के अधिक निकट है। कला में कल्पना को महत्वपूर्ण स्थान होता है। सौंदर्य और आनंद उसका लक्ष्य होता है। कला रूचि प्रधान होती है, इसलिए एक ही विषय से सम्बन्धित सामग्री द्वारा विभिन्न रूचि वाले कलाकारों द्वारा विभिन्न रचनाएँ सम्भव हैं। उदा. अनेक कलाकार एक ही पौधे को अपनी-अपनी रूचि के अनुरूप विभिन्न प्रकार से चित्रित कर सकते हैं। कला के लिए कोई भी विषय साधन होता है, साध्य नहीं। कला सर्वथा मानवीय कृति है।


उपर्युक्त विवेचन से विज्ञान और कला का अन्तर स्पष्ट हो जाता है। और यह भी स्पष्ट हो जाता है कि भाषाविज्ञान कला नहीं, बल्कि विज्ञान है। किन्तु देखना यह है कि भाषाविज्ञान अन्य विज्ञानों की तरह शुद्ध विज्ञान है या कुछ भिन्न हैं।


3) भाषाविज्ञान की वैज्ञानिकता


विज्ञान का प्रमुख लक्षण है, पदार्थों में कार्यकारण सम्बन्ध की स्थापना करना। याने किसी कारण विशेष के उपस्थित रहने पर ही कार्य होता है। विज्ञान इस बात की खोज करता है कि अगर कोई घटना घटती है तो उसका कारण क्या है? कार्यकारण भाव के विश्लेषण से बिखरी हुई वस्तुओं और असम्बद्ध घटनाओं में एकसंगति या तारतम्य स्थापित होता है। भाषाविज्ञान में बिखरी हुई सामग्री को एकत्र करके उसका विश्लेषण करने इसी प्रकार की व्यवस्था और सम्बद्धता स्थापने का प्रयत्न होता है। जैसे कोई ध्वनि किसी विशिष्ट दिशा में ही क्यों परिवर्तित होती है, इसके कारण की खोज करते हैं और कार्यकारण सम्बन्ध से ध्वनि परिवर्तन की व्यवस्था स्पष्ट करते हैं। अत: विज्ञान का मूलाधार कार्य कारण भाव भाषाविज्ञान में भी होता है।


विज्ञान का दूसरा प्रमुख लक्षण है प्रयोग चिंतन और विचार के पश्चात् प्रयोग द्वारा वैज्ञानिक विश्लेषण को प्रामाणिक बनाया जाता है। भाषा के लिए भी प्रयोग किए जाते हैं। ध्वनिशास्त्र की प्रयोगशाला में ध्वनिसंबंधी प्रयोग किए जाते हैं। किसी भाषा की ध्वनियों के लक्षणों का पता प्रयोग से ही लग जाता है। भाषा की उत्पत्ति का पता लगाने के लिए शिशुओं पर अनेक प्रयोग हुए हैं। मिस्त्र के राजा सैमेटिकस, अकबर बादशाह, फ्रेडरिक द्वितीय और स्कॉटलैंड के जेम्स चतुर्थ ने इस प्रकार के प्रयोग किए थे।


तीसरा लक्षण है विज्ञान में विकल्प नहीं होते। विज्ञान का परिणाम सार्वकालिक और सार्वत्रिक होता


है। विज्ञान के प्रयोग हम कहीं भी करें, हमें एक से ही परिणाम प्राप्त होते हैं। कुछ लोगों के अनुसार भाषाविज्ञान


में यह लक्षण लागू नहीं होता। वे कहते हैं ध्वनिपरिवर्तन के नियम सभी भाषाओं में एक से नहीं होते। किन्तु वे यह भूल जाते हैं कि विभिन्न भाषाएँ अलग-अलग होती है, और उन सब पर एक ही नियम कैसे लागू हो सकता है? ध्वनिपरिवर्तन के कारण सभी भाषाओं में एक से हो सकते हैं; परन्तु ध्वनिपरिवर्तन के परिणाम भी सभी में एक से हों, यह कैसे हो सकता है?


ध्वनियों का उच्चारण, ध्वनियों का एक सुनिश्चित दिशा में विकास, पदरचना में सरलता का आग्रह, अर्थपरिवर्तन के सुनिश्चित कारण आदि अनेक बातें भाषाविज्ञान की वैज्ञानिकता प्रमाणित करती है। संस्कृत व्याकरण की शुद्धता और अपवादहीनता भी भाषाविज्ञान की वैज्ञानिकता की पुष्टि करती है।


विज्ञान की भाँति भाषाविज्ञान भी सिद्धान्त अथवा नियम निर्धारण से सम्बन्ध रखता है। विज्ञान में किसी वस्तु का सम्यक परीक्षण करके उसके सम्बन्ध में नियम निर्धारित किए जाते हैं, उसी प्रकार भाषाविज्ञान में भी भाषा की उत्पत्ति, रचना, विकास इत्यादि सभी तत्वों के विश्लेषण से सामान्य नियम निश्चित कर लिए जाते


भाषाविज्ञान के नियम तत्त्वत: सभी स्थितियों में पूरे उतरते हैं, यद्यपि उनमें अपवाद भी परिलक्षित होते हैं। पर अध्ययन की वैज्ञानिक प्रक्रिया होने के कारण इसे विज्ञान कहना ही अधिक सार्थक होगा, कला नहीं।


भाषा का विकास जनसमाज द्वारा स्वाभाविक रूप से ही होता है, व्यक्ति की इच्छा से उसमें कोई परिवर्तन सम्भव नहीं है। अतः भाषा प्राकृतिक वस्तु है, मानवकृत नहीं। कला सर्वथा मानवीय कृति है। अतः प्राकृतिक भाषा का अध्ययन करने वाला भाषाविज्ञान विज्ञान ही है।


इतना होने पर भी भाषाविज्ञान को प्राकृतिक विज्ञाना (Natural Sciences) के समकक्ष नहीं रखा जा सकता। भाषाविज्ञान अन्य विज्ञानों की अपेक्षा नया विज्ञान है, इसलिए यह स्वाभाविक है कि


उसकी उपलब्धि अन्य विज्ञानों की अपेक्षा कम व्यवस्थित और कम नियमित हो ।भाषाविज्ञान पूर्ण रूप से विज्ञान ही है। नया और अविकसित होने के कारण यह उस तरह का विज्ञान नहीं होता, जिस तरह के गणित, रसायन, भौतिकशास्त्र आदि। वैसे ज्ञान की अनेक शाखाएँ ऐसी हैं, जिनमें विज्ञान के पूरे लक्षण घटित न होने पर भी उन्हें विज्ञान कहा जाता है। उदा. राजनीतिविज्ञान, समाजविज्ञान, मनोविज्ञान, अर्थशास्त्र आदि । भाषाविज्ञान में कहीं कहीं अपवाद मिलते हैं, अर्थात् भाषा विज्ञान रसायन, भौतिक, गणित की तरह पूर्णरूपेण विशुद्ध अथवा निश्चित विज्ञान (Exact Science) नहीं है। इसलिए वह राजनीतिविज्ञान, समाजविज्ञान की तरह का विज्ञान है।


आजकल अध्ययन के विषयों को तीन वर्गों में रखते हैं -


1) प्राकृतिक विज्ञान (Natural scienceh) उदा. भौतिकी, रसायनशास्त्र आदि।


2) सामाजिक विज्ञान (Social science) उदा. समाजशास्त्र, अर्थशास्त्र आदि ।


3) मानविकी (Humanities) उदा. साहित्य, संगीतशास्त्र, चित्रकला आदि। भाषाविज्ञान इनमें सामाजिक विज्ञान के निकट आता है। वैसे तो उसकी 'ध्वनि विज्ञान शाखा, विशेषतः ध्वनि के उच्चरित होने के बाद कान तक के संचरण का अध्ययन, प्राकृतिक विज्ञान के क्षेत्र में आती है, तो उसकी शैली विज्ञान शाखा एक सीमा तक मानविकी में।


कला की दृष्टि से देखें तो भाषाविज्ञान में उपयोगिता, मनोरंजकता और व्यवहार ज्ञान है। किन्तु यह सब गौण रूप में आते हैं। भाषाविज्ञान भाषा से सम्बन्धित सभी समस्याओं का समाधान करता है। भाषाविज्ञान में कार्यकारण भाव, प्रयोग, निरीक्षण, परीक्षण आदि वैज्ञानिक प्रक्रियाओं को अपनाया जाता है और उनके आधार पर नियमों का निर्धारण होता है। कला के विकल्प, व्यक्तिनिष्ठता, देश-काल से सीमित होना ये बातें भाषाविज्ञान पर लागू नहीं होती हैं, अतएव उसको 'विज्ञान' कहना ही समुचित है।

Wednesday, 9 June 2021

काव्यानंदमीमांसा

 बी. ए. भाग: ३

अभ्यासक्रमपञिका :१२

सञ :६

पाठ्यपुस्तक :साहित्यविचार

सञ :६

विभाग :२ काव्यानंदमीमांसा

विषय प्राध्यापक : प्रा बी. के.पाटील

🔹 परास्ताविक : आनंद हे प्रयोजन काव्याच्या प्रयोजनापैकी एक सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. त्या आनंदाचा एक महत्वाचा भाग म्हणजे रसास्वाद .काव्याचे आनंद हे प्रयोजन द्विविध आहे. एक काव्यरचना करणार्‍या कवीचा आनंद आणि दुसरा काव्याचा आस्वाद घेणार्‍या सहद्य रसिकाना होणार्‍या आनंदाचीच चर्चा अधिक झाली आहे

🔹कविचा आनंद: कवीच्या आनंदाचा विचार करतांनाही त्या आनंदाचे स्वरुप आणि कारणे असा दुहेरी विचार करावा लागतो आनंद म्हणजे सुख व सुख म्हणजे काही अनुकूल संवेदना  या पलीकडे कोणत्याही आनंदाचे स्वरुप तपशीलासह सांगणे अशक्य असते. काव्यरचना करतांना कवीला स्वत:चे भान राहात नाही. आजुबाजूच्या परिस्थीचे भान लेखकाला नसते .एक प्रकारची तादात्म्याची अवस्था निर्माण होते. समाधी लागल्यासारखी वाटते. इतकेच वर्णन या आनंदाच्या अवस्थेचे आपण करु शकतो, पण ही आनंदाची केवळ लक्षणे आहेत. प्रत्यक्ष आनंद कसा असतो? हे वर्णन करुन सांगण्यापेक्षा केवळ अनुभवानेच कळू शकते  काव्यरचन करुन झाल्यानंतर  कवीला समाधान वाटत असावे. आपण हातात घेतलेले कार्य तडीस गेले किंवा आपल्या हातून एखादी चांगली कलाकृती निर्माण झाली. या भावनेतून आनंद वाटणे स्वाभाविक आहे, माञ हा भाग निर्मितीनंतरचा आहे ते समजुन घेणे अधिक महत्वाचे आहे. पण या अवस्थेचे केवळ वर्णन करण्यापलीकडे काही सांगता येणे शक्य नसते. त्याची कारणे पाहू.

🔹करीडेचा आनंद :   काव्य ही कला आहे. सर्व प्रकारच्या कला म्हणजे क्रीडा आहेत,असे क्रीडावादी मंडळींचे मत आहे. त्यामुळे कवीला होणारा आनंद म्हणजे क्रीडेमध्ये होणारा आनंद असेच म्हणावयास हवे. क्रीडेमुळे होणार्‍या आनंदाविषयी हर्बर्ट स्पेन्सरने सांगितलेली उपपत्ती आजही मान्य केली जाते." जीवनामध्ये जीवनास आवश्यक असणारी जीवनशक्ती खर्च होऊन गेल्यावरही जी अधिकची जीवनशक्ती माणसामध्ये शिल्लख राहाते, तिचा विनियोग होण्याचा मार्ग म्हणजे माणसामध्ये असलेली क्रीडाप्रवृत्ती होय. " असे त्याचे म्हणणे आहे. जीवनशक्ती उपजीविकेच्या व्यवसायातच खर्च होऊ लागली तर मनुष्य क्रीडेला प्रवृत्त होणार नाही. जीवनशक्ती आवश्यकतेपेक्षा अधिक झाली तर तिचा विनियोग व्हायलाच  पाहिजे, तो तसा झाला नाही, तर शरीरात काही विकार उत्पन्न होईल म्हणून तो आपोआपच क्रीडेला प्रवृत्त होतो. आपल्यामध्ये असलेल्या जीवनशक्तीचा हा विनियोग शारिरीक स्वास्थ्यासाठी लाभदायकच होतो.

🔹निर्मितीचा  आनंद:   केवळ हालचाल, परिश्रम  किंवा काही वृत्ती एवढ्यानेच कवीला होणार्‍या आनंदाची सारी उपपत्ती लावता येणार नाही. तसे असते तर प्रत्येक हमाल, मजूर किंवा बौद्धिक काम करणारा कारकून यानाही कामाचा आनंद मिळाला असता. परीश्रमाचा विनियोग निर्मितीसाठी व्हावा अशी अपेक्षा काव्यामध्ये असते. एखाद्या कृतीमध्ये जसा आनंद आहे तसाच किंबहूना त्यापेक्षा अधिक आनंद काव्यनिर्मितीमध्ये आहे. लौकिक व्यवहारातही बागकाम करुन फळे-फुले निर्माण करण्यात, मोठमोठ्या राजकीय व सामाजिक योजना आखून त्या पूर्ण करण्यात सुख व आनंद असतो. याचे कारण त्या कार्यात केवळ अनुत्पादक परिश्रम किंवा हमाली झालेली नसते. सर्व कला आणि काव्य यामध्येही बर्‍याच अंशी अशीच  स्थिती असतेज

🔹आत्माविष्कारानंद :   निर्मितीच्या आनंदाचे एक महत्वाचे अंग म्हणजे आत्माविष्कार किंवा अभिव्यक्ती होय. मनूष्य जे काही करतो त्यातून त्याचे स्वत:चे व्यक्तित्व प्रकट होत असते. विशेषत: स्वत:च्या स्फूर्तीने जर त्याने काही केले असेल तर त्यामध्ये आत्माविष्कार हा असतोच असतो. कवीला सृष्टीतील विविध प्रकारचे सौंदर्य पाहून, त्याचे ग्रहण करुन ते सौंदर्य कसे असते हे वाचकाने सांगावेसे वाटते, म्हणून तो काव्यरचना करतो. त्यामध्ये त्याचा आत्माविष्कारच व्यक्त होतो. ही त्याची स्वत:ची अभिव्यक्ती त्याला सुख देवून जाते.अभिव्यक्तीएवढी सुखात्मक जाणीव इतर कशानेही त्याला होणार नाही, व्यवहातही नोकरीपेक्षा स्वत:च्या उद्योगात किंवा संयुक्त कुटुंबापेक्षा विभक्त कुटुंबात सुख वाटते, त्याचे कारण म्हणजे तेथे व्यक्तीचा आत्माविष्कारास वाव मिळतो, त्या ठिकाणी घर सजविणे, पोषाख करणे, स्वत:चे मत प्रतिपादन करणे यासारख्या प्रत्येक हालचालीतून आत्माविष्कार घडत असतो.

    प्रथम केवळ कृती मग त्यापेक्षा अधिक म्हणजे अभिव्यक्ती होय. अखेर निर्मिती या विविध क्रियाप्रक्रियातून असणारे गुण हाच काव्यलेखकाचा आनंद होय. यशप्राप्ती व अर्थप्राप्ती या आनंदात भर पडते. पण आनंदाचे हे प्रकार अनुषंगिक दुय्यम दर्जाचे व तितकेसे विशुद्ध नसणारे असे होत. यश व अर्थ हे निर्णयाची खाञी नसतानाही वाड:मय निर्मिती करीत राहतात, ते वर उल्लेखलेल्या तीन कारणामुळेच. कवीला कवी म्हणून जो आनंद होतो तो या स्वरुपाचा असतो.


स्वाध्याय: सराव प्रश्नपत्रिकेसाठी खालील लिंक गुगलमध्ये कॉपी करावी व प्रश्नपत्रिका सोडवावी.

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeppqfzXArBLmXhsBRUhku0PUAg3wjgUHlP64LoqTvCcLqWHw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link



Wednesday, 2 June 2021

मराठीचा उगम काळ

 *मराठी विभाग* 

 बी.ए.भाग- 3 सत्र-6 पेपर क्रमांक- 13 ( *भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)* 

प्रा.डॉ.विश्वास पाटील 


*मराठीचा उगम काळ* 

६) विवेक सिंधू मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ इस अकराशे 88 मधील आहे उपनिषदातील विचार सर्वसामान्य मराठी जनतेला सांगण्यासाठी मुकुंदराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे जया नाही शास्त्रीप्रतीती Iनेणती तर्क मुद्रेची स्थितीI तेया लागी मराठ्या युक्तीI केली ग्रंथरचना अस आपल्या ग्रंथरचनाचा हेतू मुकुंदराज सांगतात. विवेक्सिंधू ची ओवी साडेतीन चरणांची आहे इथे दिलेल्या ओवीत शास्त्र, प्रतीती, तर्क, मुद्रा, स्थिती, मराठी, युक्ती, ग्रंथरचना असे शब्द येतात.

७) लीळाचरित्र  -मराठीतील पहिला गद्य ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या लीळा म्हणजे आठवणी त्यांच्या शिष्याने म्हणजेच माहीम भटाने संकलित करून चरित्र रूपाने या ग्रंथात मांडलेल्या आहेत. या ग्रंथाचे एकाक,पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे तीन विभाग असून एकूण १५०९ लीळा आहेत चरित्राची रचना १२८३ मध्ये झालेली असावी. यादव काळात संस्कृत भाषेबरोबरच मराठी भाषा बोलली जात होती याचा उत्तम पुरावा म्हणजे हा चरित्रग्रंथ होय.

      या ग्रंथातील काही शब्दरूपे पुढीलप्रमाणे- सौंदर (सुंदर),पुरूषू (पुरूष),पुसणे(विचारणे),सांघणे( सांगणे),एथ(येथे),सरण(शरण),परिसाळ(पाठशाळा),हाट(बाजार)इत्यादी.

८) ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९० मध्ये लिहिला आहे. ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वराने आपला ग्रंथास दिलेले नाही. केले ज्ञानदेवे गीतेI देशीकार लेणेI एवढेच त्यांनी लिहिलेले आहे. नामदेवानी ज्ञानेश्वरी असा उल्लेख केला. गीतेच्या अठराव्या अध्यायातील सातशे लोकांवर मूळ अध्याय व क्रम न बदलता सुमारे ९५०० ओव्यांचे हे भाष्य त्यांनी लिहिलेले आहे.

     ज्ञानेश्वरीतही ऊ काराचे प्राबल्य आढळते. गणेशु, प्रकाशु, निवृत्तीदासू, तर्कु, अंकुशु वेदांतू ,मोदक, सिद्धू, केवळ, घेतू अशी शब्दरूपे आढळतात.

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing