Friday, 25 June 2021

अष्टप्रधान मंडळ

 (Dr. Dhere V. D.)

अष्टप्रधान मंडळ

B .A .I History Sem.II Paper II (भाग २)

          

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या स्वराज्याची सुव्यवस्था लावण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केलेली होती. प्रधान मंडळाची कल्पना ही खूप पूर्वीपासून भारतात असलेली आपणास दिसते. मौर्य कालखंडात राजाला सल्ला देण्यासाठी 'रत्निन' नावाचं मंडळ होतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजाच्या प्रधान मंडळाचा उल्लेख आहे.  चाणक्यनिती, कानकनिती या ग्रंथांमधून आपणास हे उल्लेख आढळतात.त्यात राजाला सल्ला देण्यासाठी व राजाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधान मंडळाची गरज व्यक्त केलेली आहे. राष्ट्र हा  राष्ट्रपुरुष  समजून या राष्ट्रपुरूषाचे मस्तक म्हणजे राजा व इतर अवयव म्हणजे प्रधानमंडळ अशा प्रकारचे उल्लेख आढळतात.

        आपण शिवकाळाचा विचार केला तर तत्कालीन भारतात अस्तित्वात असणाऱ्या शाह्या व मुघल सत्ता यांच्याकडेही प्रधान मंडळे होती. या सर्व प्रधानाना जहागिरी/मनसबी  दिलेल्या असत. पण शिवाजी महाराजांनी आपले जे प्रधान मंडळ नियुक्त केले त्यांना वतन न देता वेतन दिले. त्यांच्याकडे जाहागिरी सैन्य न देता राष्ट्रीय सैन्य दिले /स्वराज्याचे सैन्य दिले.

           अष्टप्रधान मंडळाची निर्मिती :.              

       शिवरायांच्या जन्माच्या वेळी दुष्काळ आणि युद्धाच्या धामधूमीत मुळे शांतता, सुव्यवस्था नष्ट झाली होती. लष्करी अत्याचाराला जनता कंटाळली होती. वतनदार छळ करत होते. या असुरक्षित, अस्थिर आर्थिक विवंचनेच्या काळात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याची, राज्यकारभाराची सुराज्याची, व्यवस्थेची सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ एकाच वेळी तयार केलेले नाही.१९४२ सलिल जिजाबाई व बाल-शिवाजी बेंगलोर हून पुण्याकडे येत असताना शहाजी महाराजांनी त्यांच्यासोबत चार प्रधान दिले होते. पेशवा, मुजुमदार, डबीर आणि सुरनिस यानंतर शिवरायांनी सेनापती हे पद निर्माण केले. ते तुकोजी चोर, माणकोजी दहातोंडे नंतर नेताजी पालकर यांना दिले. मिर्झाराजा जयसिंग च्या मोहिमेवर त्यांनी रघुनाथ पंडित यांना पंडितराव हा किताब पद देऊ च्या सुमारास त्यांनी न्यायाधीशाचे पद निर्माण केले व निराजी रावजी यांना दिले. १६७४ ला राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या कडे आठ प्रधान होते त्यामुळे या प्रधानमंडळाला अष्टप्रधानमंडळ असेच नाव होते. ते पुढील प्रमाणे---

       अष्टप्रधान मंडळाची कामे.....

१). मुख्यप्रधान (पेशवा) 

            प्रधान मंडळाचा प्रमुख. लष्करी व मुलकी खात्यांवर देखरेख करणे. स्वराज्याची व्यवस्था रक्षण व विस्तार यासाठीच्या उपाययोजना राजाला सांगणे. शेजारील देशांतील घडामोडींवर लक्ष ठेवणे. छत्रपती स्वराज्यात हजर नसताना सर्व कारभार चोख व निस्वार्थी पणे पाहणे. मुलगी प्रदेशाचा कारभार पाहणे प्रसंगी युद्धात भाग घेणे.

२). अमात्य (मुजुमदार)

           सध्याच्या अर्थमंत्र्यांची भूमिका ही अमात्याची होती. राज्याचे अंदाजपत्रक तयार करणे जमाखर्चाच्या बाबीची राजाला माहिती देणे. उत्पन्न वाढीचे उपाय सुचवणे. महत्वाची हिशोब पत्रके आज्ञापत्रे यावर आपली मुद्रा उमटवून छत्रपतींना समोर ठेवणे. प्रदेशाचा कारभार करणे व प्रसंगी युद्ध मोहिमांत भाग घेणे.

३). सेनापती (सरलष्कर)

            संपूर्ण सैन्याचे नेतृत्व करणे. सैन्याची शिस्त राखणे.सचोटीचे सैन्य भरती करणे. त्यांचे प्रशिक्षण,शस्त्रास्त्र, दारुगोळा, रसद, आवश्यक गरजांची पूर्तता करणे. सेनेची नेमणूक करणे. युद्ध मोहिमांचे नियोजन करणे. शत्रू सैन्याची बित्तंबातमी राखणे. त्यांच्या कमजोर ठिकाणी युद्ध करून जिंकण्याचे नियोजन करणे. जिंकलेल्या प्रदेशाचे संरक्षण करणे. युद्धात पराक्रम गाजविणारा यांचा गौरव करणे, पराक्रमी उद्याची छत्रपतींकडे शिफारस करून त्यांना बढती देणे. फितुरांना पकडून शासन करणे.युद्धातील लूट, चौथाई यांचा हिशोब छत्रपतींना सादर करणे.  प्रदेशाचा कारभार करणे युद्ध मोहिमांमध्ये सहभागी होणे.

४). सचिव (सुरनीस) 

        राज्याचा व छत्रपतींचा पत्रव्यवहार पहाणे सर्व दप्तरावर देखरेख करणे.स्वराज्यातील विविध प्रांतातील अधिकारी लष्करी अंमलदार किल्लेदार यांच्याकडून येणारी पत्रे खालीते पाहणे अशय तपासून घेणे. इनामपत्रे, दानपत्रे,सनदा, हवालापत्रे,आवश्यक सरकारी कामकाजाची पत्रे यांच्यातील दोष दुरुस्ती करणे. छत्रपतींचे व राज्याचे खलिते लिहिणे,पाठविणे. स्वराज्याच्या हिशोबावर तपासणी करून संमती दर्शक सही करणे. प्रदेशाचा कारभार करणे प्रसंगी युद्ध मोहिमांत सहभागी होणे. 

५). मंत्री (वाकेनवीस) 

            छत्रपतींचा खाजगी चिटणीस म्हणून यांना ओळखले जाते. छत्रपतींचा खाजगी पत्रव्यवहार, दैनंदिन कार्य, दररोजच्या घडामोडी यावर देखरेख ठेवून नोंदी ठेवणे. छत्रपतींचे भोजन तपासणी करणे, राज संरक्षक दल व गुप्तहेर खात्यावर नियंत्रण ठेवणे, आलेल्या पाहुण्यांवर देखरेख ठेवणे त्यांची व्यवस्था करणे. प्रदेशाचा कारभार करणे व


Dhere Sir, [22.06.21 20:09]

[Forwarded from Dhere Sir]

युद्ध मोहिमांत सहभागी होणे. 

६). सुमंत (डबीर)

           परराष्ट्र मंत्री चे कार्य सुमंत करत असे. परराज्यांशी पत्रव्यवहार करणे व सलोख्याचे संबंध ठेवणे. परराज्यात घडणाऱ्या घडामोडी, हालचाली, अंतर्गत संघर्ष, परराज्यातील वकील यांच्याकडे लक्ष देणे, राजशिष्टाचार पाळणे, शत्रू प्रदेशातील लष्कर व इतर हालचालींची बित्तंबातमी काढून स्वराज्य विस्तारासाठीची उपाययोजना छत्रपतींसमोर ठेवणे. भविष्यकालीन डावपेचांची आखणी करणे. प्रदेशाचा कारभार पाहणे व युद्ध मोहिमांत सहभागी होणे.

७). पंडितराव (दानाध्यक्ष)

               संपूर्ण धर्म विषयक अधिकार पंडितराव कडे होते. छत्रपतींना पूजा-अर्चा,विधी,दानधर्म विषयक मार्गदर्शन करणे. संतमहंत विद्वान यांचा यथोचित सन्मान करणे. धर्मविषयक खटल्यांचे निराकरण करणे. 

८). न्यायाधीश.

            संपूर्ण राज्याच्या न्यायदानाची जबाबदारी त्यांच्याकडे असे. गोतसभा,ग्राम पातळीपासून सरसुभ्यापर्यंत  शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या न्याय निवाड्यात अन्याय वाटत असेल तर रयतेला मध्यवर्ती सरकारकडे अर्ज करता येत असे. न्याय अन्यायाची बाजू तपासून नि:पक्षपाती न्यायदान करणे. जमिनीचा हक्क ग्रामप्रमुखांचे हक्क इत्यादी निकाल पत्रांवर संमती म्हणून सही करणे व छत्रपतींकडे सादर करणे.

            महाराष्ट्र अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये....

 १).  प्रधानांच्या नेमणुका व बडतर्फी...

            शिवाजी महाराज अष्टप्रधानमंडळातील प्रधानांच्या नियुक्त्या स्वतः करत असत. योग्य,कार्यक्षम व्यक्तीची नेमणूक ते करत.त्यामध्ये जात,धर्म,पंथ इत्यादी बाबी अजिबात विचारात न घेता फक्त कार्यक्षमता हाच निकष होता. पदावर असलेल्या मंत्र्यांकडून अयोग्य कार्य झाले किंवा दुसरी कार्यक्षम व्यक्ती भेटली तर महाराज त्याची नियुक्ती त्या पदावर करतात व पहिल्या व्यक्तीला बडतर्फ करत.         

२).वंशपरंपरागत पद्धतीचा त्याग ... 

            तत्कालीन इस्लाम राजवटीमध्ये अधिकाराची पदे ही वंशपरंपरागत दिली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पदे कार्यक्षमता विचारात घेऊन दिली. जरी कार्यक्षम व्यक्ती सदर पदावर असताना मयत झाली तर ते पद वंशपरंपरागत न देता दुसऱ्या कार्यक्षम व्यक्तीला दिले.

३). जहागिरी ऐवजी रोख वेतन ....        

           शिवकालीन पूर्व कालखंडात  प्रधानांना त्यांच्या सेवेच्या मोबदल्यात जहागीर किंवा वतन दिले जात असे. शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेल्या प्रधानांना रोख वेतन दिले. त्यांच्या कार्यक्षमता, कार्याचा आवाका पाहून वेतनामध्ये भरघोस वाढ केली.जहागिरी पद्धतीचे दोष त्यांना माहीत असल्याने कोणासही जहागीर दिली नाही. 

४). लष्करी व मुलकी अश्या दोन्ही जबाबदाऱ्या...

        सेनेचे नेतृत्व संयोजन करणे हे सेनापतीचे काम होते पण पंडितराव आणि न्यायाधीश वगळता सर्व मंत्र्यांना म्हणजेच प्रधानांना युद्धाच्यावेळी हातात शस्त्र घेऊन सैन्याचे नेतृत्व करावे लागे. तसेच मुलूख ( सुभा -सरसुभा) त्यांच्याकडे कारभारासाठी दिला जात असे. स्वराज्यात दौरे काढून जनतेच्या अडचणी त्यांना सोडवाव्या लागत.

५). संयुक्त जबाबदारी...

        स्वराज्यातील कारभाराची अष्टप्रधान मंडळावर संयुक्त जबाबदारी होती. निर्णय, तह, करार-मदार याबाबत सर्वांनी संमतीची मुद्रा उमटवावी लागे. याचा अर्थ घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी सर्व मंत्र्यांवर असे.

६). छत्रपतींना सल्ला देणे...

        अष्टप्रधान मंडळातील प्रधान हे छत्रपतींना सल्ला देत असत. पण तो सल्ला छत्रपतींना बंधनकारक नव्हता. याउलट छत्रपतींनी दिलेले आदेश हे सर्व मंत्रिमंडळाला बंधनकारक होते.

Tuesday, 22 June 2021

Business Correspondence

 Radhanagari Mahavidyalaya,Radhanagari 

B.Com. I, Subject – English 

Semester – II 

MODULE-V 

 A) Business Correspondence

 Introduction:

Communication through exchange of letters is known as correspondence. We communicate our feelings and thoughts to our friends and relatives through letters and this communication is called personal correspondence. A businessman also writes and receives letters in day to-day transactions, which may be called business correspondence. Business correspondence means the exchange of information in a written format for the process of business activities. Business correspondence takes place between different organizations or between the customers and the organization.

 Need for written communication:

Now-a-days business operations are not restricted to any locality, state or nation. Today production takes place in one area but consumption takes place everywhere. Since the businessman as the well as the customers live in far off places, they don't have sufficient time to contact each other personally. Thus, there arises the need for writing letters. Now the importance of letters has increased because of vast expansion of business, increase in demand as well as supply of goods. The importance of business correspondence is important for maintaining proper relationships. It can serve as an evidence to create and maintain goodwill and help in expansion of business. 

Types of Correspondence:

Business letters are the most formal methods of communication and follow specific formats. They are addressed to a particular person or organization. The main types of business correspondence are: 1) Letter of Inquiry 2) Letter of Claim/Complaints 3) Letter of Application 4) Letter of Approval/Dismissal 5) Letter of Recommendations 6) Letter of Promise.

असंहकार चळवळीचे मूल्यमापन

(Sawant S. R.) 

बी ए भाग 2 इतिहास विभाग पेपर नंबर--6  भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे--  

असंहकार  चळवळीचे मूल्यमापन -- 

असहकार सर्वांचे मूल्यमापन करत असताना या चळवळीला पूर्णपणे यश मिळाले नाही. हे खरे असले तरी त्यातून काही गोष्टी मध्ये यश देखील प्राप्त झाले या चळवळीचे मुल्यमापन पुढील प्रमाणे करता येइल --- 

महात्मा गांधींनी असहकार चळवळ चोरा चौरी येथील घटनेमुळे थांबवली. परिणामी देशातील सर्व सर्वसामान्य जनता नेतेमंडळी त्यामध्ये सहभाग असणारा वर्ग निराश झाला. गांधीना हिंसाचार अजिबात मान्य नव्हता. परिणामी ही चळवळ थांबवली गेली. त्यानंतर गांधीजींनी भारतीय जनता आंदोलनाला प्रशिक्षित झाल्याशिवाय आणि त्याचबरोबर सत्य अहिंसा सत्याग्रह याचं योग्य आकलन झाल्याशिवाय चळवळ राबवणे चूक ठरेल असे गांधींना वाटले. त्यामुळे त्यांनी ही चळवळ तहकूब केली. दुसरे म्हणजे 

खिलाफत चळवळ  ही धार्मिक चळवळ होती .या चळवळीला पाटिबां  देणे चूक होती .परिणामी हिंदू-मुस्लीम त्यातून फारसे सख्य स्थापन झाले नाही .त्याच बरोबर ही चळवळ तुर्कस्तानच्या खलिफा विषयी होती. सहाजिकच खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे ही महात्मा गांधीजीची चूक होती. असे जनतेला वाटू लागले.त्याचबरोबर गांधींचे एक वर्षात स्वराज्य मिळवून देणे गांधीजी म्हणाले होते तसे झाले नाही .यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. पदव्या 

मान सन्मान याचा त्याग बऱ्याच लोकांनी केला नाही हा त्याग मोठ्या प्रमाणात लोकांनी केला असता तर त्याचा परिणाम निश्चितच झाला असता.परिणामी ही चळवळ अपयशाला हे एक  

कारण ठरले असले तरी देखिल असहकार चळवळ मध्ये काही उणिवा राहिल्या तरीदेखील काही उल्लेखनीय कामगिरी निश्चित झाली. ते पुढीलप्रमाणे यामध्ये राष्ट्रीय चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली आतापर्यंत फक्त शहरी मध्यमवर्ग पुरती असलेली राष्ट्रीय चळवळ खेड्यापाड्यातील पोचली.हे फार मोठे यश होते. असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात. काँग्रेस कृतिशील संघटना बनली काँग्रेस फक्त मोर्चा निवेदन हरताळ या माध्यमाचा वापर करत होती. परिणामी त्याला अपेक्षित असे यश प्राप्त होत नव्हते. संघटनात्मक मरगळ आली होती. या चळवळी मूळे राष्ट्रसभा एक कृतिशील व्यासपीठ बनले. त्यानंतर सरकार विषयी भीती नष्ट झाली सामान्य माणसांची तुरुंगवास आणि सरकार बद्दलची भीती दूर झाली हजारो लोक पोलिसांचा लाट्या काठ्या खाण्यास व तुरुंगात जाण्यास आनंदाने तयार होऊ लागले. तुरुंगातून लोक बाहेर जाईना म्हणून ब्रिटिश पोलीस भारतीयांना  बाहेर आणून सोडू लागले.आंदौलकाशी कसे वागावे हेच पोलीस व सरकारला कळेनासे झाले.हे चळवळीचे यश होते.स्वराज्य हे अंतिम ध्येय ठरले आता पयृंत सुधारणा मागणाऱ्या कॉंग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले. हा  या आंदोलनातील मोठे यश मानावे लागे या असहकार आंदोलनामुळे हिंदी जनतेत नवीन चैतन्य निर्माण होण्यास मदत झाली .

रजिया (रेखाचित्र) - रामवृक्ष बेनीपुरी

 (Eknath Patil)

रजिया (रेखाचित्र) - रामवृक्ष बेनीपुरी

F. Y. B. A.  ,  HINDI  ,  paper no - II  ,  semester - II  ,     

लेखक परिचय :

रामवृक्ष बेनीपुरी हिंदी के सिद्धहस्त रेखाचित्रकार के रुप में मशहूर है। उनका जन्म बिहार के मुजफ्फरपुर जिले के बेनीपुर गाँव में जनवरी 1902 में हुआ। पिता का नाम कुलवंतसिंह था। एक साधारण किसान परिवार में बेनीपुरी जी का बचपन गुजरा। आपकी आरंभिक शिक्षा ननिहाल (बंशीपचरा) तथा बेनीपुरी में हुई। आप साहित्य विशारद तक पढे। काव्य लेखन से बेनीपुरी जी की साहित्यिक यात्रा का श्रीगणेशा हुआ।


साहित्य सृजन के साथ आपने पत्रकारिता तथा राष्ट्रभाषा का कार्य किया। साहित्य सर्जन के क्षेत्र में रेखाचित्र के अलावा - बेनीपुरी जी ने नाटक, जीवनी, कहानी, उपन्यास, निबंध तथा बालसाहित्य में अपना योगदान किया। आपने लगभग सौ ग्रंथों की रचना की। इनमें से उल्लेखनीय है - माटी की मूरते, पतितों के देश में, लाल तारा, गेहूँ और गुलाब, आदि। अंबपाली, संघ मित्रा, अमर ज्योति बेनीपुरी जी की सफल नाट्य रचनाएँ रही है। आपके द्वारा संपादित 'विद्यापति की पदावली' बहुचर्चित रही।


बेनीपुरी जी बहुमुखी प्रतिभा के धनी थे। आपका व्यक्तित्व क्रांतिकारी था। आपकी भाषा प्रौढ एवं परिमार्जित रही। आप संस्कृत, अंग्रेजी और उर्दू के जानकार थे। आप स्वतंत्रता संग्राम में सक्रिय थे। सन् 1930 से 1942 के काल में आपका अधिकतम समय कारावास में जेल जीवन के संस्मरण (जंजीरे और दीवारे) त्याग और बलिदान की कहानियाँ है। सन 1968 में आप स्वर्ग सिधारे। गुजरा। आपके


प्रकाशित रचनाएँ


'लाल तारा' (1946), माटी की मूरते' (1950)


'गेहूँ और गुलाब' (1957), 'मील के पत्थर' प्रकाश में आए है।


प्रस्तुत रेखाचित्र में गाँव की एक मुसलिम चूडीहारिनी, जो इस गाँव में एकमात्र है, उसका चित्र खींचा गया है। इस चूडीहारिनी का नाम हैं- 'रजिया' जब वह छोटी थी, अपनी माँ के साथ लेखक के घर अक्सर आया करती थी। इसी प्रकार वह पूरे गाँव में अपनी माँ के साथ घूमा करती थी। उसके कानों में हमेशा चाँदी की बालियाँ, गले में चाँदी का हेकल, हाथों में चाँदी के कंगन और पैरो में चाँदी की गुडाई रहती थी। उसका यह साज- -श्रृंगार बाल्यावस्था में लेखक को हमेशा आकर्षित करता रहताथा। कभी-कभी तो लेखक रजिया का पीछा तक करता था। तब रजिया की बूढी माँ, मजाक में कह भी देती थी "बबुआजी, रजिया से ब्याह कीजिएगा?" और संकोच के कारण लेखक वहाँ से खिसक जाता था।'रजिया' का आशय :


रामवृक्ष बेनीपुरी का उत्कृष्ट और कालजयी व्यक्तिपरक रेखाचित्र रजिया है। रजिया एक सच्ची ग्रामीण दृष्टि प्रदान करनेवाली मुस्लिम चूडीहारिनी पात्र है। लेखक का रजिया का वर्णन बाल्यावस्था और साज-श्रृंगार वर्णनआकर्षित लगता है। लेखक की भावना परम वैयक्तिक तथा निजी अनुभूतियों से युक्त है। लेखक द्वारा नायिका, वातावरण, घटनाएँ तथा संबंध के परिवेश एक दूसरे से इस प्रकार घुलमिल जाते है जिसकी एकसूत्रता अवश्य बनी रहती है। लेखक ने कहा कि गाँव में एक मात्र पात्र अलग है जिसका चित्र खींचा गया है।


लेखक ने 'रजिया' का वर्णन शुरूआत में ही ऐसा सुंदर रेखांकित किया है जो पाठकों के सामने पात्र को खड़ा करते हैं। वे कहते है कि, “रजिया ने कानों में चाँदी की बालियाँ पहनी हैं। गले में पहनने का सुंदर चाँदी का गहना है। हाथों में चाँदी के कंगन डाले है और पैरों में चाँदी के गोंडाई (पायल) पहने हैं। रजिया ने भर बाँह की बूटेदार कमीज पहनी है। काली साडी के छोर को गले में लिपटा है। गोरे चेहरे पर लटकते हुए बाल संभालने में परेशान छोटी-सी लड़की लेखक के सामने खड़ी होती है। लेखक अपने बचपन की बात कहते है कि स्कूल से आते है जैसे मानो कसाईखाने से रस्सी तोडकर आए हुए बछडे है। स्कूल से आकर मौसी के दिए हुए छठपूजा में बनाए ठेकुए लेखक झूले बैठकर खा रहा था। इतने में आवाज आती है, “खाना मत छूना" तब उसका ध्यान छोटी रजिया पर जाता है। हिंदु बस्ती में उन्होंने कभी मुस्लिम लड़की को देखा नहीं था। क्योंकि बचपन में एक मेले में लेखक खो गया था तब उन्हे अघोरी विधा के अनुयायी उठाकर ले जा रहे थे तभी गांव की एक लड़की नजर पड़ी और उसी कारण वह बच पाये। माँ-बाप का बचपन में ही साया उठने से उनका पालन मौसी ने किया था। मौसी उसे कभी अपने आँखो से ओझल नहीं होने देती थी। गाँव में बहुत सी लड़कियाँ थी लेकिन रजिया जैसी वेशभूषा, चाँदी के गहने, रंग-रूप, आँखों का नीलापन और समूचे चेहरे का ढंग देखकर उसे एक टक लेखक घूरने लगा। जहाँ से आवाज आयी थी, वह रजिया की माँ थी। रजिया की माँ ने लेखक के आँगन में चूडियों का बाजार पसारकर रखा था। वहाँ बहुतसी बहू बेटियाँ उनको घेर कर चूडियों का मोल भाव कर रही थी। उस बच्ची को पहली बार देखकर उत्सुकता जाग गयी। मौसी ने उसे भी ठेकुए और कसार दिया। वह लड़की नहीं ले रही थी। माँ के कहने से लेने के बाद लेखक ने उसे सवाल पूछे उसके जवाब सिर्फ गर्दन हिलाकर ही दिया।

रजिया और उनकी माँ खरीदारिनों की तलाश में दूसरे आँगन में चली गयी। लेखक उनके पीछे चला गया तब रजिया की माँ ने कहा, "बबुआजी, रजिया से ब्याह कीजिएगा?" फिर बेटी की ओर मुखातिब हो मुस्कराहट से कहा, "क्योंरी रजिया, यह दूल्हा तुम्हें पसन्द है?" उनके कहने से वहाँ से लेखक भागता है। ब्याह और वह भी मुसलमान लड़की से? उनके जाने के बाद उन्होंने मुडकर देखा। रजिया चूडिहारिन इसी गाँव में रहनेवाली थी। बचपन, जवानी और शादी भी इसी गाँव के मुसलमान लड़के से हो गयी और कभी-कभी लेखक से उनकी मुलाकात होती रहती थी। लेखक पढ़ते-पढते शहर में पढ़ने गया। छुट्टी में जब भी आता तब रजिया माँ के पीछे घूमती रहती, वो पढ़ नहीं सकी। वह चूड़ियाँ पहनने की कला जान गयी। रजिया बढ़ती हुई उसके शरीर और स्वभाव में भी बदलाव आया। पहले शहर से आने के बाद दौडकर निकट आके तरह-तरह सवाल पूँछती अब कुछ दिनों बाद सकुँचा रहती। अब वह स्वतंत्र रूप में चूडियों का व्यापार करती। रजिया के सौंदर्य के आकर्षण से बहुओं के पतिदेव दूर से ताकते रहते थे। बहुओं के सामने वह उनका मजाक उड़ाती थी तब वहाँ से पतिदेव भागते थे। इसीतरह रजिया अपने पेशे में निपुण हो रही थी। यह निपुणता रजिया की माँ के पास थी।


लेखक का शहर में रहना बढ़ता गया तबसे रजिया से भेट दुर्लभ होती गयी। एक दिन गाँव में रजिया के साथचुडियों से भरा टोकरा सिर पर लिए नौजवान देखा तो लेखक ने समझ लिया की उसका पति है। लेखक ने मज़ाक से कहा कि, "इस मजूरे को कहाँ से उठा लाई है रे?" तब उन्होंने कहा कि वे उनके पति है। रजिया की माँने बचपन में मजाक से दूल्हे की बात याद आयी। वह भी दिन आ गया कि जब वही लेखक पति बने उसकी पत्नी को चूडियाँ पहनाने रजिया आ गयी उन्होंने खूब धूम मचायी थी।


समय बीतता गया। रजिया और लेखक की भेट पटना शहर में हुयी। रामवृक्ष बेनीपुरीजी एक छोटेसे अखबार के संपादक के रूप में काम करते थे। एक चौक में तभी एक बच्चा आकर कहने लगा बाबू आपको औरत बुला रही है, यह बात सुनकर लेखक को पद प्रतिष्ठा का खयाल आया। यहाँ प्रसिद्ध पान की दूकान में वे पान खा रहे थे। चौक में से लोग इधर-उधर चले जाने के बाद बच्चे ने जहाँ इशारा किया वही पहुँच गये। तभी वहाँ एक स्त्री यानी रजिया ने आकर 'सलाम मालिक' कहा। बातचीत के दौरान समझ गया कि जमाना बदल गया है। चूडियाँ दूल्हनों के साजश्रृंगार की नयी चीजें लेकर आयी थी। रजिया लेखक को रहने का ठिकाना पूँछने लगी तब लेखक अचरज में पड़ गया तभी अधेड उम्र का उसका पति हसन आ गया तो लंबी दाढी, पाच हाथ लम्बा बन गया था। हसन पान लाने के बाद रजिया किस तरह दुनिया बदल गयी है यह बताते हुए कहती है, “अब तो ऐसे गाँव है जहाँ हिंदू मुसलमानों के हाथ से सौदे नहीं खरीदते । अब हिंदू चुडिहारिने हैं, हिंदू दरजी है। " रजिया ने यह भी खुशी की बात बताई, मेरे गाँव में यह पागलपन नहीं है। रजिया के अलावा लेखक की पत्नी किसीसे चूडियाँ लेती नहीं थी। दूसरे दिन रजिया अपने पति को लेकर डेरेपर हाजिर हो गयी। लेखक की पत्नी को देने के लिए चूड़ियाँ देती गयी। लेखक ने रजिया को ही चूड़ियाँ देने की बात कही तब उन्होंने अपने हाथ से पहनाने की बात कही जिसने पति प्रेम की बात बतायी।


काफी समय बाद एक दिन अचानक लेखक रजिया के गाँव में पहुँच गये थे। चुनावी चक्कर का कठिन कार्य था। उस गाव में पहुँचते ही उन्हें रजिया चूडीहारिन की याद आयी। नेता बने लेखक की जय-जयकार हो रही थी। उनको अपने घर में लेने के लिए लोग भाग्य समझते थे। वही नेता स्वर्ण युग संदेश लोगों को सुना रहे थे लेकिन दिमाग में अलग गुत्थियाँ उलझी थी। इतने में ही भीड से छोटी बच्ची रजिया आ गयी, जिस तरह रजिया दिखती है। बीच में चालीस-पैतालीस साल का अंतर ही खत्म हुआ था। तब किसीने कहाँ कि वह ठीक अपनी दादी जैसी है। उन्होंने लेखक का हाथ पकडकर कहाँ, "चलिए मालिक, मेरे घर । "


लेखक रजिया के आंगन में खडा था। छोटा सा घर लेकिन साफ-सुथरा रजिया का पति हसन मर गया था। उनके तीन लड़के थे। बड़ा कलकत्ता में कमाता है, मंझला उनका ही पिढीजात पेशा संभालता है छोटा लडका शहर में पढ़ता है। रजिया जैसी दिखनेवाली बडे लडके की बेटी हैं। उस लडकीने रजिया को आँगन से ही पुकारा, “मालिक दादा आ गये।” रजिया ने पोती को भेज दिया किंतु उन्हें विश्वास नहीं था कि ये बड़े नेता जो मोटार गाडी से चलनेवाले हैं, उनके घर में आऐंगे। उन्होंने बहुओं से कहलाकर बीमारी में पडे मैलेकुचले कपडे बदल दियें। नजदीक आकर लेखक से 'मालिक सलाम' कहा। लेखक को लगता है उसके चेहरे से झुरियाँ चली गई, उसका चेहरा बिजली की तरह चमक उठा है।इस तरह 'रजिया' रेखाचित्र स्मृतिकणों के बेजोड संयोजन का परिणाम है। रेखाचित्र के समाप्त हो जाने के उपरान्त भी हम सब कुछ भूलकर कुछ देर तक उसी रस में तन्मय रहते है। इस व्यक्तिपरख रेखाचित्र में लेखक की अपनी तीव्र अनुभूति तो है साथ ही रजिया की परिवर्तित स्थिति पाठक को एक ऐसे संभ्रम में डाल देती है जिससे उबरने की अपेक्षा वह अधिक अधिक धँसता चला जाता है और लेखक की अनुभूति के साथ तादाम्य कर लेता है।

मराठ्यांचे मुलकी प्रशासन

 (Dr. Dhere V. D.)

मराठ्यांचे मुलकी प्रशासन

B .A .I History Sem.II Paper II (भाग 1)


रयतेच्या कल्याणासाठी उभारलेल्या स्वराज्याचे प्रशासन हे रयताभिमुख असले पाहिजे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हे प्रशासन अधिकाधिक जनतेच्या कल्याणाचा विचार करेल अशा पद्धतीने त्याची रचना केली. आपण जर स्वराज्याच्या निर्मितीचा त्यामागील हेतू चा उद्देश यांचा विचार केला तर आपणास असे लक्षात येते की,

            स्वराज्य निर्मिती ही-स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करणे,हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे, स्वराज्य संकल्पनेत धर्मनिरपेक्ष राज्य ही भूमिका राबविणे,प्रजेच्या हितार्थ रक्षणार्थ दक्ष कारभार करणे, स्वराज्यातील रयत व वित्ताचे रक्षण करणे. शत्रूपासून रयतेचे व स्वराज्यातील प्रदेशाचे रक्षण करणे,जात-पात धर्म व गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता प्रजेचे पालन,पोषण,रक्षण करणे ही दिसून येतात. ही उद्दिष्टे जर साध्य करावयाची असतील तर कार्यक्षम व दक्ष प्रशासन गरजेचे होते. त्यासाठी राज्य सामर्थ्यशाली बनवणे,राजाबद्दल राज्याबद्दल लोकांच्या मनात निष्ठा निर्माण करणे व प्रजाहितदक्ष कारभार करणे यासाठी शिवरायांनी प्रशासकीय रचना मजबूत करण्याकडे अधिक लक्ष दिले.

            शिवकालीन मुलकी प्रशासकीय रचना.....

शिवकाळातील मुलगी प्रशासनाची वैशिष्ट्ये पाहत असताना त्याची दोन भागात विभागणी करता येते.

१). केंद्रीय प्रशासन २). प्रांतिक प्रशासन.

१). केंद्रीय प्रशासन..... 

अ). छत्रपती.. स्वराज्याच्या प्रशासनातील छत्रपती हे सर्वोच्च पद होते राज्याचा प्रमुख छत्रपती हा कारभार यंत्रणेच्या केंद्रस्थानी होता प्रशासन योग्य पद्धतीने चालावे यासाठी मंत्रिमंडळ छत्रपतींच्या आधिपत्याखाली होते राज्याचे लहान-मोठे अनेक विभाग,उपविभाग,सुभे,कारखाने या सर्वांवर छत्रपतींकडून अंमल केला जात होता. छत्रपती हे पद सार्वभौम होते. प्रशासनातील नियुक्‍त्या,युद्ध,तह रयतेच्या कल्याणासाठी चे निर्णय,निवाडे हे सर्व त्यांच्या अधिकारात येत असत. स्वराज्यातील अंती मिळण्याचा अधिकार छत्रपतींच्या हाती होता. 

ब). अष्टप्रधान मंडळ... स्वराज्याच्या मुलकी कारभारातील जनतेच्या सोयीसाठी,राजाला योग्य सल्ला देण्यासाठी व राजाचे निर्णय योग्य पद्धतीने राबवून जनकल्याण करण्यासाठी छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती.१. मुख्य प्रधान २.अमात्य.३. सेनापती ४. सचिव ५. मंत्री ६. पंडितराव ७. सुमंत ८. न्यायाधीश. असे अष्टप्रधान राजाला सल्ला देण्याचे व राज्याचे निर्णय अमलात आणण्याचे कार्य करीत असत.

क). कारखाने व महाल : स्वराज्याच्या प्रशासनाचे विभागणी आठ प्रधानामध्ये केल्यानंतर त्यांच्या हाताखाली अनेक अधिकाराची खाती निर्माण करण्यात आली या खात्यांना 'कारखाने' किंवा 'महाल' असे संबोधले जात असे. शिवाजी महाराजांनी १८ कारखाने व १२ महाल निर्माण केले होते. या कारखाने व महालांमध्ये कामकाज करण्यासाठी अनेक अधिकारी कारकून व मदतनीसांची नेमणूक केली होती.

ड). स्वराज्याचे विभाग व उपविभाग... प्रशासनाच्या सोयीसाठी शिवरायांनी स्वराज्याचे चार विभाग केले होते. त्यांना 'सरसुभा' असे म्हटले जाई.

१. उत्तर कोकण ते साल्हेर-मुल्हेर व पुणे.

२.  कर्नाटकातील धारवाड ते कारवार.

३. दक्षिण कोकण व कारवार पर्यंतचा किनारपट्टीचा भाग

४. म्हैसूर व मद्रास राज्यातील प्रदेश.

यावर या चार सरसुभ्यांवर 'सरसुभेदारांच्या'  नियुकत्या केलेल्या होत्या. 

त्यांच्या हाताखाली सुभेदार, महालदार, महाजन, दिवाण, मुजुमदार,फडणीस,सबनीस, कारखानीस, चिटणीस, जमादार,पोतनीस इ. अधिकारी असत.

        सरसुभ्याचा  उपविभाग म्हणजे 'सुभा' त्यावर 'सुभेदार' हा अधिकारी नेमलेला असे.

         सुभ्याचे अनेक 'परगण्यात' विभाजन केले होते. परगण्यावर 'सरहवालदार' या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती.

          परगण्याचे विभाजन 'महालात ' केले होते. महालाचा अधिकारी म्हणून 'हवलदार' यांची नेमणूक केली होती. काही ठिकाणी त्याला 'महालदार' असेही म्हणत.

           'खेडे' हा सगळ्यात शेवटचा विभाग होता. बाजारपेठेच्या गावांना 'कसबे' आणि लहान खेड्यांना 'मौजे' असे म्हणत होते त्यावर 'पाटील' हा अधिकारी कारभार पाहत असे. त्याच्या मदतीला कुलकर्णी हा अधिकारी होता.

     २). प्रांतिक प्रशासन ....

 अ. प्रशासनाचा शेवटचा भाग म्हणजे खेडे किंवा गावपातळीवरील प्रशासन... खेडी स्वयंपूर्ण होती शेती हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय होता ज्यांची गावात जमीन आहे आणि नाही ते सर्व गावात राहत असत उदरनिर्वाह करत असत त्याची विभागणी पुढील प्रमाणे

 १) मिरासदार.. जे परंपरागत गावचे रहिवाशी आहेत ज्यांच्या मालकीची जमीन आहे व ज्यांना नागरिकत्वाचे हक्क आहेत तोच सभेत भाग घेता येतो ते सर्व मिरासदार होय.

 २). उपरे....ज्यांना गावात जमीन नाही. कोणत्याही प्रकारचे सामाजिक अथवा नागरिकत्वाचे हक्क नाहीत. अशांना उपरे असे म्हणतात. जे गावात मोलमजुरी अथवा ठराविक मुदतीने जमीन कसण्याच्या करारावर गावात येऊन राहतात.

 ३). अलुतेदार बलुतेदार...यानंतरचा महत्त्वाचा रहिवाशांचा वर्ग म्हणजे बलुतेदारांच्या वर्ग होय. गावची विविध प्रकारची सेवा हे बलुतेदार अथवा ग्रामसेवक करत असत. या श्रमाचा मोबदला म्हणून गावच्या जमीनधारकांकडून त्यांना सुगीच्या काळात धान्य उत्पादनाचा काही भाग दिला जात असे त्याला 'बलूते' असे म्हणत.  सामान्यतः बलुतेदार बारा होते. हे गावचे प्रतिष्ठित नागरिक होते. गोतसत्तेच्या निवडा पत्रात त्यांची नावे व्यवसाय चिन्हासह अथवा निशाणी सह नोंदवली जात.अलुतेदार.......शेती व इतर कार्यासाठी वरील बलुतेदारांची शेतकऱ्यांना/गावकऱ्यांना जशी गरज होती तसे इतर सेवा देणाऱ्यांची गरज होती. इतर सेवा देणाऱ्यांना आलुतेदार असे म्हटले जात असे. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला "अलुते "असे म्हटले जाई.

      पाटील आणि कुलकर्णी यांनी खेड्यातून जमा केलेला महसूल वसूल देशमुख, देशपांडे यांच्याकडे पाठवायचा होता.

      गोळा झालेला शेतसरा देशमुखाकडे त्याचा हिशोब देशपांडे कडे होता.

      देशमुख देशपांडे यांच्याकडे मदतीसाठी वरिष्ठ प्रतीचे नोकर होते. हिशोब तपासणीस म्हणून मुजुमदार, दस्तऐवज नोंदणीसाठी फडणवीस,जाबजबाब लिहिण्यासाठी सचिव अशी मंडळी कचेरीत कामाला होती. मामलेदार हा वरिष्ठ मुलकी अधिकारी होता त्याच्या हाताखाली शिबंदी (सैन्य)होती,कचेरीत दिवाण हा अधिकारी होता. शिवाय कमाविसदार,तरफदार, शेखदार हे मामलेदार कचेरीत होते.

      अशाप्रकारे सरसुभेदार ते पाटील अशी  अधिकाऱ्यांची एक साखळी शिवकाळात तयार करण्यात आलेली होती. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या रयतेची काळजी घेणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते.

      

शिवरायांच्या मुलकी प्रशासनाची वैशिष्ट्ये...

१). राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी छत्रपती : मुलकी लष्करी व न्याय प्रशासनावर अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होता. ते सार्वभौम पद होते.

२). अष्टप्रधान मंडळाची निर्मिती व नियुक्ती : शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व प्रशासनाच्या सोयीसाठी नेमले त्यांची निवड ते स्वतःला करीत असत. अष्टप्रधान मंडळ हे राजाला जबाबदार होते.

३). मुलकी कारभाराची अनेक खात्यांमध्ये विभागणी :  प्रशासनाच्या सोयीसाठी बारा महाल आणि अठरा कारखाने इत्यादी उपविभागात मध्ये मुलगी खात्याची विभाग केली त्यावर अनेक अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली.

४). छत्रपतींचा वैयक्तिक व राज्याचा पत्रव्यवहार पाहण्यासाठी चिटणीस ची नेमणूक केली गेली त्याच्या हाताखाली अनेक अधिकारी होते.

५). मुलकी व लष्करी कामाचा समान दर्जा : लष्करी काम आहे इतकाच महत्वपूर्ण दर्जा हा मुलकी कामकाजात कार्य करणाऱ्यांना देण्यात आला.

६). प्रजा हितरक्षणार्थ कारभार : रायतेचे कल्याण हेच स्वराज्याचे संपूर्ण कारभाराचे उद्दिष्ट होते.वतनदारा कडून किंवा अधिकाऱ्यांकडून रयतेचा छळ होऊ नये यासाठी सर्वजण दक्ष होते.

७). इतर सत्ता पेक्षा करामध्ये कपात : तत्कालीन आदिलशाही, कुतुबशाही मुगल इतर सत्ताधीशांच्या राज्यात आकारल्या जाणाऱ्या करण्यापेक्षा स्वराज्यातील करांचे प्रमाण अल्प होते.

८). सारा निश्चिती व वसुली : स्वराज्याचे तीन वेळा जमीन मोजणी झाली ज्याद्वारे उत्पादनावर आधारित सारा ठरवण्यात आला त्याची वसुली वेतन अधारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास रयतेला होणार नाही याची काळजी घेतली गेली.

Monday, 21 June 2021

महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची कारणे

 Sawant R., [21.06.21 14:43]

BA--2  भारतीय स्वातंत्र्या चळवळीचा इतिहास पेपर नंबर 6 --महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची  कारणे--- 

महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी असहकार आंदोलनाची घोषणा करण्याचा अगोदर हे आंदोलान  का करावं लागलं आपण बघणार आहोत.या मध्ये पहिले कारण रौलट अॕक्ट हे कायदे क्रांतिकारकांचा मोठ्या प्रमाणात उदय होत होता. त्या प्रमाणात ब्रिटिशांना त्याची धास्ती वाटत होती, भारतीय लोकांच्यादेश द्रोही हालचाली रोखण्यासाठी मिस्टर रौलट  यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली. आणि तिच्या शिफारशीनुसार 1919 आली सरकारने  कायदे केले त्याला रोलेट कायदा म्हणतात. या कायद्यानुसार भारतीय याःच्यावरविनाचौकशी खटला दाखल केला जानार होता. शिक्षा झाल्यास त्याला उच्च न्यायालयात अपील करता येणार नव्हते.  पोलीस कचेरीतुन रोज हजेरी लावणे ही सक्ती केली गेली होती. सरकारला दडपशाहीचे एक प्रकारे स्वातंत्र्य या कायद्यामुळे मिळाले होते. अशा कायद्यामुळे भारतीय लोकांच्या वर प्रचंड दडपशाही केली गेली .हे जुलमी कायदे मी चालु देणार नाही हे गांधीजींनीत्या वेळी ठणकावून सांगितले आणि त्यांनी 30 मार्च 1919 देश व्यापी आंदोलनाची तारीख घोषित केली त्यानंतर  जालियनवाला बाग हत्याकांड घडले भारत देशाच्या इतिहासातील अतिशय व अमानवी घटना म्हणजे 1919चे  जालियनवाला  बाग हत्याकांड होय रौलट कायद्याला विरोध म्हणून पंजाब मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू होता 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत निषेध सभा आयोजित केली होती या सभेला हजारो लोक जमले होते ही संधी साधून पटांगण बंदिस्त होते त्याला एकच आत-बाहेर करण्यास वाट होती त्या संधीचा फायदा घेऊन ही वाट जनरल डायरने बंद केली .आणि ब्रिटिश सैनिकांन करवी बंदुकी द्वारे हजारो गोळ्या हिंदी जनतेवर मारल्या यामध्ये चारशे लोक मारले गेले हिंदुस्तानच्या इतिहासात अशा प्रकारच्या हत्याकांडाने देश पेटून उठला ही घटना घडल्यानंतर व्हाइस राॕय ओडवायरने जनरल डायर ला शाबासकी दिली या मुळे भारतीयांच्या  मनातअसंतोष निर्माण झाला. अधिकच  हे आंदोलन गतिमान करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी गांधीजीने मुस्लिम समाजाची  खिलापत चळवळ सुरू होती त्या चळवळीला पाठिंबा दिला या पाठिंबा च्या निमित्ताने हिंदू मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्यासाठी एका ठिकाणी आले एक प्रकारे ब्रिटिशाना  मोठा इशारा होता. या सगळ्याला भारतातील जालियनबाग हत्याकांडाची चौकशी करन्या साठी व भारतीय  असंतोष शांत करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली होतीत्याचा अहवाल 23 मे 1919 रोजी  प्रसिद्ध केला जनरल ला दोषी ठरवून त्याला निवृत्त केले. इंग्लंडमध्ये डायरच्या सन्मानासाठी इंग्रज साम्राज्याचा त्राता म्हणून निधी उभारला गेला. यावेळेला भारतामध्ये त्याच्या मुळे तीव्र असंतोष पसरला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अहिंसा मार्गाने आक्रमक असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि हे आंदोलन म्हनजे असहकार आंदोलन चळवळ होय या आंदोलनाला वरील कारणे कारणीभूत ठरली आणि याच कारणामुळे ब्रिटिशांच्या वरचा गांधींचा विश्वास उडाला .म्हणून  त्यांनी  असहकार आंदोलनाची घोषना केली.लावून त्याची चौकशी केली जानार होती. या कायद्याच्या माध्यमातून भारतीयानां ञास दिला जात होता. त्याच्यावर अपील करता येणार नव्हते.शिवाय विनाचौकशी कोणत्याही भारतीय व्यक्तीला अटक करता येणार होते. या कायद्याला विरोध करन्यासाठी13-4-1919 ला अमृतसर मध्ये जालियनवाला बागेमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यासाठी लोक एका ठिकाणी जमले असताना .ब्रिटिशांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला .त्याच्या मध्ये 400 लोक मारले गेले 13 एप्रिल 1919  रोजी ची घटना आहे या घटनेमुळे देशात असतोंष निर्माण  झाला.परीनामी गांधींना ब्रिटिशांच्या वर विश्वास दाखवली ती चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सर्व भारतीयांच्यात ऐक्य निर्माण व्हावे  या साठी स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांनी देखील सहकार्य मिळावे यासाठी महात्मा गांधींनी खिलापत चळवळीला पाठिंबा दिला  त्याचबरोबरजालीयन बाग हत्याकांड करन्यातत आले.परीणामी वरील सर्व  कारना मुळे देशात असतोष निर्माण  झाला"देशाने त्या वेळी गांधीनी  ब्रिटिशांच्या विरोधात   आंदोलन सुरू केले .करन्याचा निर्णय  घेतला गांधीजी नी1920 चे असहकार चळवळ चे आंदोलन हाती घेतले 4 -9-1920रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार  आंदोलनाचा ठराव पास केला. गेला आणि पुढे असहकार चळवळीचा कार्यक्रम निश्चित करून हे आंदोलन सुरू केले गेले .या आंदोलनाचे कार्यक्रमां मध्ये  पुढील गोष्टीचा अंतर्भाव होता. यामध्ये  लोकांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मानसन्मान अधिकार पदे याचा त्याग करायचा. स्वदेशी मालाचा वापर.परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा.सरकारी  सभा कार्यक्रमांना हजर राहायचे नाही. सरकारी शाळा महाविद्यालय विद्यापीठे यातून शिक्षण घ्यायचे नाही .ब्रिटिश न्यायालयावर


Sawant R., [21.06.21 14:43]

बहिष्कार टाकायचा. भारतीय लोकांनी न्याय पंचायत सुरू करायच्या .स्थानिक स्वराज्य संस्था कायदेमंडळ यांचे वर बहीष्कार टाकायचा .  कायदेमंडळाच्या निवडणुका बहिष्कार टाकायचा अशा पद्धतीचा असहकार आदोंलनाचा चा कार्यक्रम होता. आणि या निमित्ताने गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले गेले या चळवळीमुळे 

देशामध्ये स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला गेला स्वदेशी मालाच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले गेले हातमागाच्या व्यवसायाचे पुनर्जीवन झाले. दारुबंदीचा प्रचार अस्पृश्यता निवारण हिंदू-मुस्लीम एक्य या साठी यासाठी प्रयत्न होऊ लागली लोकांनी पदव्या व मानसन्मान यांचा त्याग केला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस पदवीचा त्याग केला गांधीजीनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला रविद् नाथ टागोर यांनी सर या पदविचा त्याग केला.परीनामी असहकार  चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत ते उच्चशिक्षित तरुण या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. हे आदोंलन ब्रिटिशांनी दडपून   टाकण्याचा प्रयत्न  केला त्यात  ब्रिटिशांना यश आले नाही . या आंदोलनात अनेक लोकांना अटक केली गेली 1921 25 हजार कार्यकर्त्यांना केले गेले होते.तरी देखील  हे आंदोलन सुरु होते.हे आंदोलनसुरुअसताना  उत्तर  पृदेश चौरी चौरा येथे5--2-1922 रोजी बंदीचा सत्याग्रह सुरु असताना पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारतीय जनतेने पोलिसांना मारहाण करून .त्याना ठिर मारले. पोलीस चौकी जाळली. परिणामी महात्मा गांधींनी ही चळवळ तहकूब  केली.जोपर्यंत अहिंसेचे महत्व लोकांना कळत नाही तो पयृतं कोणतीही चळवळ यशस्वी होणार नाही . अशी गांधीनी  खूणगाठ बांधली .आणि यामुळेच असहकार चळवळ त्यांनी मागे घेतली. अनेकांना हा निर्णय आवडला नाही. ही संधी साधून  10 मार्च 1922 रोजी गांधीजींना अटक केली त्यामध्ये त्यांना सहा वर्षाची शिक्षा दिली. असहकार चळवळी चे  मूल्यमापन करताना असे लक्षात येते कीया चळवळी ला जरी अपेक्षित यश मिळाले नाही तरी .भारतीय  स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचली. काँग्रेसचे कृतिशील संघटना बनली सरकार बद्दलची लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती ती भीती नष्ट झाली. आतापर्यंत सुधारणा मागणाऱ्या काँग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले .हे  आंदोलनाचे यश होते. या आंदोलनामुळेच त्यामध्ये नवचैतन्याची निर्मिती झाली नवीन विचार करायचे सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची फळी तयार झाली.  जरी ही चळवळ यशस्वी झाली नसली तरी अ यशस्वी झाली अशी देखील म्हणता येणार नाही. मात्र या चळवळीमुळे हिंदुस्तान स्वातंत्र्य चळवळ विषयी जागृत झाला असे मात्र नक्कीच म्हणावे लागेल.

गांधीयुग

(Sawant S. R.) 

भारतीय  स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास. पेपर न.६---  

प्रकरण-2 --गांधीयुग 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील 1920 ते 1947 या कालखंडाला गांधी युग असे म्हटले जाते.या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला .गांधींचे पूर्वचरित्र. 2 ऑक्टोंबर सोळा 1869 रोजी पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. 1888 ते 1891 या काळात त्यांनी इग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  

 वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर.1893 गांधीजी वकीलीच्या व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. 

तेथे त्यांना गोऱ्या लोकांच्या कडून  अपमानास्पद वागणूक मिळाली त्या  अनुभवामुळे गांधींच्या आयुष्याला वेगळी कलाटणी  मिळाली .आणि यातूनच गांधीवादाची सुरुवात झाली .महात्मा गांधींचे तत्वज्ञान हे सत्य. अहिंसा.सत्याग्रह.याच्या आधारावर आधारलेले होते. गांधीजीनी स्वातंत्र्य चळवळ  यशाश्वी करण्या साठी पुढील , मागृचा अवलंब केला त्यामध्ये असहकार .सविनय कायदेभंग.आणि चले जाव. या चळवळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या महत्त्वाच्या होत्या. आणि याच चळवळीच्या जोरावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी केली.  

दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील गोऱ्या लोकांच्या विरुद्धआंदोलन यशस्वी केले होते. 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आले. नामदार गोखले यांचे त्याना मार्गदर्शन लाभले. 1916  त्यांनी साबरमती आश्रम स्थापन केला .आणि त्यानंतर त्यांनी  देशसेवेला वाहून घेतले.भारतामध्ये प्रथम त्यानी चंपारण्य सत्याग्रह केला.त्यानंतर 1918 ला खेडा सत्याग्रह केला. 1919 ला गिरणी कामगारांसाठी पहिले उपोषण केले. या आंदोलनामध्ये गांधीजींना मोठ्या प्रमाणात यश मिळाले .वेगवेगळ्या आंदोलनामध्ये गांधींना मिळालेल्या  यशामुळे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर देशाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले . यानंतर त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात  असहकार आंदोलन सुरू केले .

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing