Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

बी. ए. भाग :२ /मराठी अभ्यासकक्रमपञिका क्रं४/ सञ:३/ पाठ्यपुस्तक:काव्यगंध / कविता:जातीय दंगल :१२भानगडींची१३वळणे-अजीम राही

बी. ए. भाग :२ मराठी अभ्यासकक्रमपञिका क्रं४ सञ:३ पाठ्यपुस्तक:काव्यगंध विषय प्राध्यापक:प्रा. बी. के. पाटील कविता:जातीय दंगल :१२भानगडींची१३वळणे-अजीम राही         'जातीय दंगल:१२भानगडींची१३ वळणे :दंगलीची भीषणता.      या कवितेत दंगलीची भीषणता कवी व्यक्त करतात. माणसं एकमेकावर गुरगुरु लागली की दंगल जवळ आली असं समजाव असं ते म्हणतात. जातीयदंगलीच्या राञीचे भयाण वर्णन करताना ते म्हणतात, समष्टीच्या झाडाचा मोहर गळतो आणि मेंदूत कळकट विचार थैमान घालतात. दंगलीत लोकांची भाषाही बदलते.सगळे गावच दहशतीने पोखरुन गेले आहे. पशुपक्षी यांच्याही जीवनावर दंगल परिनाम करते.         गावात एरवी एकोपा असतो.सामंजस्य, समन्वय असतो. पण दंगलीच्या राञी हे सगळे संपते.या राञी विसंवादाचे रक्त भळाभळा वाहू लागते. जखमांचा मोसम येतो. या दंगलीच्या राञी कवीने काय करावं असा प्रन्न अजीम राही यांना पडतो. कविता जाळून कवीने दगडफेकीत सामील व्हावं की काय? सगळं सौजन्य गळून पडतं गावाचं आरोग्य बिघडतं अन कुटिल कारवाया कळस गाठतात.    माञ शेवटी कवी म्हणतात: "मंदिरावरचा कबुतरांचा थवा ...

बी. ए. भाग :२/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध./सञ:३/ घटक:३ /अजीम नवाज राही(वंचितांची कविता) / कवी अजीम राही यांचा परिचय.

बी. ए. भाग :२ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं: ४ पाठ्यपुस्तक :काव्यगंध.सञ:३ विषय प्राध्यापक :प्रा. बी. के. पाटील घटक:३ अजीम नवाज राही(वंचितांची कविता)         कवी अजीम राही यांचा परिचय.            कवी अजीम राही यांचा जन्म१मे१९६५ रोजी झाला.बुलडाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुक्यातील सावरखेर्डा हे त्यांचे मूळ गाव आहे. ते आठवी पासून मराठी माध्यामात  शिकले.याचा परिणाम दहावीत ते मराठी भाषेच्या पेपरमध्ये नापास झाले व त्यांचे शिक्षण तेथेच थांबले.   पण मराठीत नापास झालेल्या या कवीच्या कविता कालांतराने दहावी मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडल्या गेल्या दुष्काळ व पडझड या त्या कविता होत.       गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत विद्यापीठ अमरावती,त्याच्या कविता अभ्यासाला आहेत.      अजीम नवाज राही यांच्या कवितांचे इंग्रजी व हिंदी अनुवाद झाले आहेत.    राही यांना मिळालेले पुरस्कार :             *महाराट्र फाऊंडेशन     ...

बी. ए भाग २/ सञ : ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ / पाठ्यपुस्तक : काव्यगंध / वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया

 बी. ए भाग २   सञ  : ३    मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४   पाठ्यपुस्तक  : काव्यगंध   विषय प्राध्यापक : प्रा. बी. के. पाटील       वास्तववाद : भयभीत वर्तमानाला आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया.          वास्तववाद ही कविता भयभीत आणि अस्वस्थ भोवतालला दिलेली प्रतिक्रिया आहे.      "जी बीजे पेराल, तशी पिकं निघतात.        तिरस्कार, घृणा, हिंसा यांची बीजे पेराल तर         रक्तानं रंगलेल्या पिकांची कापणी करावी लागेल           आणि खळ्यात तुडवल्या जातील उदध्वस्त वस्ता"     असे कवी म्हणतात.          आज जगभरात द्बेष, हिंसा यांचेच राजकारण दिसते.काही व्यक्ती मुद्दामच वंश, धर्म यांचा आधार घेतात आणि माणसामाणसात भेद निर्माण करतात. प्रेम दिल्याने प्रेम वाढते ही शिकवण जणू विसरुनच गेली आहे. सुंकुचित अस्मितांचे मुद्दे पुढे करुन माणसामाणसातील दरी वाढविण्याचे काम सुरु आहे.हेच वास्तव आज कवीला अस्वस्थ करत आ...

बी. ए. भाग २ / मराठी /अभ्यासक्रमपञिका क्रं४ सञ ३/ पाठ्यपुस्तक :काव्यगंध/ पुतळे : पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.

बी. ए. भाग २ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं४ सञ ३ पाठ्यपुस्तक :काव्यगंध विषय प्राध्यापक: प्रा. बी. के. पाटील  पुतळे :  पुतळ्याच्या माध्यमातून विकृत राजकारण.            पुतळे कविता एका वेगळ्या विषयावर नेमकेपणाने बोट ठेवते.समाजातील थोर लोकांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला व्हावी, त्यांचे स्मरण राहावे म्हणून पुतळे उभे केले जातात. हे पुतळे त्या-त्या समाजाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक प्रतीक असतात.समाजाच्या अस्मितांचे प्रतिबिंब या पुतळ्यात पडलेले असते.    पण हे झाले आदर्श विचार. आज समाज इतका बदलला आहे, इतका विकृत झाला आहे की जगभर पुतळे तोडफोड करायचे काम बिनधास्तपणे सुरु आहे.       अफगाणिस्तानातील गौतम बुध्दाचे सहाव्या शतकातील दोन पुतळे तालिबानी लोकांनी डायनामाईट लावून फोडले. पुण्यातील संभाजी उद्यानातील कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही विकृत माणसांनी फोडला. अशा घटनांनी कवीचे संवेदनशील मन अस्वस्थ होते आणि पुतळा सारखी कविता जन्म घेते.      यापुतळ्यांना स्व:ला काहीच कळत नसतं आणि उन्हापावसात उभं राहायची त्या...

बी.ए.भाग २ / मराठी/ अभ्यासक्रमपञिका ४ सञ: ३/पाठ्यपुस्तक -काव्यगंध/ खेळ : मुक्तपणे जगू इच्छिणार्‍या मुलीच्या आयुष्याचा खेळ

बी.ए.भाग २ मराठी अभ्यासक्रमपञिका ४ सञ: ३पाठ्यपुस्तक -काव्यगंध. विषय प्राध्यापक बी के पाटील      खेळ : मुक्तपणे जगू इच्छिणार्‍या मुलीच्या आयुष्याचा खेळ         खेळ ही आकाराने लहाण पण मोठा आशय सामावणारी त्यांच्या कवितापैकी एक महत्वाची कविता आहे.   या कवितेत लहान मुली खेळ  खेळत आहेत.     "कुणी घ्या जाई        कुणी घ्या चमेली        कुणी घ्या गुलाब"            असे म्हणत आहेत.हे एक साधच  गाणं आहे. इथे प्रत्येक मुलीला हव्या त्या रंगाचे, हव्या त्या वासाचे फूल निवडायचे स्वातंञ्य आहे. या खेळात एक मुक्तपणा आहे. स्वच्छंदीपणा आहे.      हा  खेळ संपतो आणि एक भयानक वास्तव समोर येतं, मग निवडीचं स्वातंञ्य संपत आणि रागावणं, भुवया चढवून दटावणं, गुरकावून, आरडून ओरडून गप्प बसवणं सुरु होतं .हे प्रत्येकीच्याच वाट्याला येतं. खेळातला मुक्तपणा संपतो.    खेळात स्वातंञ्य आहे . पण ते प्रत्यक्षात देणे यात मोठा धोका आहे असे पुरुषांना वाटते. मुली खरेतर सक्षम आह...

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ /सञ ३/ पाठ्यपुस्तक - काव्यगंध/ कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके/

बी. ए. भाग २ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ सञ   ३ पाठ्यपुस्तक - काव्यगंध. कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके. विषय प्राध्यापक -प्रा. बी. के. पाटील.            आख्यान-जागतिकीकरणामुळे माणसाच्या आयुष्याची झालेली परवड.               आख्यान ही दीर्घ कविता आहे.जागतिकीकरणामुळे, काॅर्पोरेट जीवनामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे हरवले आहे. त्याच्या अस्तित्वाची परवड सुरु आहे. ही परवड कवीने या कवितेत मांडली आहे. हे आख्यान पूर्वीही चालू होतं आणि आत्ताही चालूच आहे.      हरिश्चंद्राचा मुलगा रोहित याला बळी देण्याऐवजी शनु:शेपाचा बाप फायद्यासाठी शनु:शेपाला बदली बळी देण्याचे कबूल करतो, हा उल्लेख कवी करतो व आपलाही बदली बळी दिला जातो असं म्हणतो. केवळ मूठभर धान्याच्या बदल्यात  आपला बळी दिला आहे.या राजकारणी व श्रीमंतांनी एक गुढी उभारली आहे. ते बुध्दीजीवी लोकांची बुध्दी विकत घेतात.आज लोकांची गुणवत्ता ही एक विकत घेण्याची वस्तू बनली आहे. पण कवीची मूल्यांवर निष्ठा आहे. त्यामुळे त्याला भ्रमिष्ट झाल्यासारखे वाटत आहे.   ...

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४/ सञ :३/ काव्यगंध/ वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

 बी ए भाग  २ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ सञ  :३ काव्यगंध विषय प्राध्यापक प्रा. बी के पाटील वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता. परिचय  :वसंत आबाजी डहाके यांचा जन्म ३०मार्च,१९४२ रोजी यवतमाळ जिल्हातील बेलोरा या गावी झाला.१९६० पासून ते कविता लेखन करत आहेत. १९६६साली सत्यकथा मासिकात योगभ्रष्ट कविता प्रसिद्भ झाली. चंद्रपुरमधिल २०१२च्या ८५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.     १९७२चा योगभ्रष्ट हा त्यांचा पहीला काव्यसंग्रह,त्या नंतर शनु:शेष, चिञलिपी इ. काव्यसंग्रह प्रसिद्भ झाले.      काव्य लेखनामागे डहाके यांच्याजाणिवांचे अंत:सूञ आहे. त्या संध्याकाळी समूद्र या कवितेतील वसंत आबाजी डहाके  यांच्या मनाची अवस्था  :         या कवितेत  कवी समुद्र आपल्याला रक्ताळलेल्या घोड्यासारखा दिसला असे म्हणतात. कवी मुबईभर फिरला.त्याला कुठेच करमेना.पण प्रत्येक क्षणी समुद्र आपल्या आसपास आहे असेच त्याला वाटत होते.      ही कविच्या मनाची अवस्था आहे . मुंबई हे महानगरीय कवीला समुद्रासारखे विशाल, घोड्यासारखे ...

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ शब्दाचे मोल ¤ चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)

(E-content created by Dr V. S. Patil)   बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)  ¤ शब्दाचे मोल ¤               चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)                   ▪️शब्दाचे मोल▪️                   मध्य प्रदेशातील रायपूर येथे जन्म. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर येथे उच्च शिक्षण . नामवंत वकील ,गांधीवादी विचारांचा प्रभाव. अंतयात्रा , काळाची पावले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंजिल दूरच राहिली, माणूस नामा, मानवनिष्ठ अध्यात्म, शोध गांधींचा, समाजमन , सहप्रवास,सूर्योदयाची वाट पाहूया अशा मराठी पुस्तकांचे लेखन न्यायमूर्ती का हलफनामा , लोकतंत्र एंव राहों के अन्वेषण ही हिंदी पुस्तके प्रसिद्ध इ.स.2004 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.                 त्यांच्या काळाची पावले या पुस्तकातून 'शब्दाचे मोल' हा उतारा घेतलेला आहे वडील दादा धर्माधिकारी यांच्या सहवासात ...

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤ शांता शेळके

  बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)  ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤               शांता शेळके (1922-2002)                                              ▪️पन्नासपैकी शून्य मार्क्स ▪️                       प्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री,अनुवादक व गीतकार. 'नवयुग ' या साप्ताहिकात नोकरी.नागपूर,मुंबई येथे मराठीचे अध्यापन. कविता,कथा,कादंबरी,व्यक्तिचित्रे,बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा,आत्मकथन,अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारावर लेखन.वर्षा,रूपशी,तोच चंद्रमा....,गोंदण,ओळख,जन्मजान्हवी,पूर्वसंध्या,इत्यर्थ इ.काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रकाशित. मुक्ता आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह व स्वप्नतरंग ही कादंबरी प्रकाशित. शब्दांच्या दुनियेत हा ललितलेखसंग्रह. कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद. धुळपाटी हे आत्मकथन. हायकू या जपानी काव्यप्रकारात लेखन. पश्चिमरंग,वडीलधारी माणसे ही व्यक्तिचित्रणात्म...

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ वाटेवरच्या सावल्या ¤ कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर

 बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)  ¤ वाटेवरच्या सावल्या ¤        कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर  (1912-1999)           ▪️वाटेवरच्या सावल्या▪️                  आधुनिक कवी,नाटककार व कादंबरीकार. 'जीवनलहरी','विशाखा','किनारा,'मराठी माती,'स्वगत',' हिमवर्षाव,'वादळवेल', महावृक्ष इ.काव्यसंग्रह प्रकाशित. 'दुसरा पेशवा',कौंतेय','आमचं नाव बाबूराव ','ययाती आणि देवयाणी','वीज म्हणाली धरतीला','नटसम्राट 'ही नाटके प्रकाशित. कालिदासाच्या 'मेघदूता'चे तसेच अन्य पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर 'वैष्णव ','जान्हवी,'कल्पनेच्या तीरावर 'या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शिवाय कथा,निबंध आणि काव्यसमीक्षात्मक लिखाणही त्यानी केलेले आहे.साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.              'वाटेवरच्या सावल्या' या पाठात कुसुमाग्रज यांनी त्याच्या बालपणातील सुंदर आठवणी ओघवत्या भाषेत कथन केल्या आहेत.कौटुंबिक वातावरण,माध्यमिक शाळेत असताना साहित्य,...

बी.ए. भाग-१ मराठी /आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

  बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)  ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤                यशवंतराव बळवंतराव चव्हाण  (1913-1984)               महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते.सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग, 1942  च्या छोडो भारत आंदोलनात सहभाग,स्वतंत्र भारताचे संरक्षणमंत्री,गृहमंत्री,अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री. कार्यक्षम मंत्री,उत्तम संसदपटू,उदारमतवादी नेते,वक्ते आणि लेखक म्हणून परिचित. 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र. 'सह्याद्रीचे वारे',युंगातर या दोन संग्रहातून विचारप्रवर्तक भाषणे प्रकाशित.  ▪️निवड▪️            या पाठातून यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयीन जडणघडणीचा प्रत्यय येतो.कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते, कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश, वाचनाशी जडलेले नाते,शिक्षणाबरोबर समाजकारण, राजकारणातील सक्रियता,अभ्यासमंडळे,सभा-संमेलनातील सहभाग या सर्वांमुळे कायद्याच्या प्रथम वर्षांत आलेले अपयश,त्यावर केलेली मात,दुसरे महा...

मराठी अभ्यासपत्रिका -3 / सेमिस्टर -III / बी.ए. भाग- 2/ नाटक- काय डेंजर वारा सुटलाय! लेखक-जयंत पवार

(E-content created by Dr V. S. Patil) मराठी अभ्यासपत्रिका -3 , सेमिस्टर -III       बी.ए. भाग- 2 नाटक- काय  डेंजर वारा सुटलाय!लेखक-जयंत पवार  नाटक:          नाटक हा एक वाड़मय प्रकार आहे.नाटक दृकश्राव्य वाड़मय प्रकार आहे. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला-  * नाटक या वाड़मय प्रकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील.  * नाटकाच्या दृकश्राव्य स्वरूपाचे वेगळेपण नोंदवता येतील.  * नाटक या वाड़मय प्रकाराच्या जन्माचा इतिहास सांगता येईल.  * नाटक या वाड़मय प्रकाराची व्याखा करता येईल.  ● नाटक व्याख्या● 1) शब्दांनी तयार झालेले संवाद साभिनय सादर करावयाची कला म्हणजे नाटक.  2) एका मानवी समूहाने दुसर्‍या मानवी समूहासमोर सादर करावयाची कला म्हणजे नाटक. 3) नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय,इ.घटकांच्या मदतीने करता येते.पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दानी तयार झालेल्या संहितेत असावी लागते. ● नाटकाचे घटक ●  ( अ) विषयसूत्र   ( ब)...

बी. ए. भाग 1 / मानसशास्त्र परिचय / प्रकरण-1----मानसशास्त्राची ओळख

               के. वाय . एकल (मानसशास्त्र विभाग)                                                      बी . ए. भाग 1                     मानसशास्त्र परिचय             प्रकरण-1 ---- मानसशास्त्राची ओळख           मानसशास्त्र म्हणजे काय — आधुनिक जगामध्ये मानसशास्त्र हे प्रगत शास्त्र मानले जाते मानवी प्रेरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून मानवी वर्तन व मानसिक प्रक्रियांचे गुड करण्याचा यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहे यशस्वी प्रयत्न मानसशास्त्र करत आहेजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध...

बी.ए. भाग ३ /मराठी अभ्यासक्रमपञिका७ / सञ पाचवे/ साहित्यविचार घटक १/ ललित साहित्य म्हणजे काय ?

बी.ए. भाग ३ मराठी अभ्यासक्रमपञिका७ सञ  पाचवे साहित्यविचार घटक १ विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील ललित साहित्य म्हणजे काय ?     प्रस्तावना :                साहित्याचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात येते की,सर्व सामान्य माणसाच्या व्यावाहारिक जीवनात साहित्य हा शब्द अनेकदा वापरला जातो. हा शब्द साधन या अर्थी वापरला जातो. जसे चिञकलेचे साहित्य म्हणजे ब्रश,पेन्सिल, रंग, कागद इ,होय. तर बांधकाम साहित्य म्हणजे वाळू, सिमेंट पाणी, घमेली इ. होय.    तर कथा, कविता, इतिहास, भूगोल रसायनशास्ञ हे सर्व साहित्य आहे.पण कथा, कविता, कादंबरी नाटक इ. उल्लेख केला तर ते ललित साहित्य आहे असे म्हणता येईल आणि इतिहास, भूगोल, गणित, भूमिती हे सर्व ललितेतर अगर शास्ञीय वाड्मय म्हणता येईल.     काही साहित्य हे समूहनिर्मित असते, त्याला लोकसाहित्य म्हणतात तर काही साहित्य हे व्यक्तिनिर्मित असते त्याला ललित साहित्य म्हणतात.         ललित साहित्याचा अभ्यास करत असतांना वाड्मयाच्या परंपरेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारतीय स...

बी. ए भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार / घटक १/ आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या

बी. ए भाग ३ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ सञ  पाचवे साहित्यविचार     घटक  १ विषय प्राध्यपक प्रा. बी. के. पाटील   आधुनिक मराठी साहित्यिकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या :     प्रस्तावना :          आपण पाहिले शेकडो वर्षापूर्वी पौर्वात्य म्हणजे संस्कृत साहित्यकारांनी काव्य म्हणजेच साहित्याची व्याख्या करुन ठेवली आहे      आधुनिक मराठी साहित्यातही ना. सी. फडके यांच्याही आधीपासून मराठी साहित्याची व्याख्या लेखक करत आहेतच. या बाबत पुढील  साहित्यिकांचा विचार पाहू    १. विनोबा भावे  : विनोबा भावे म्हणजे विनायक नरहरी भावे. हे भारतीय स्वातंञ्य सैनिक होते.भूदान चळवळीचे महत्वाचे काम त्यांनी केले अहींसा व करुणा ही त्यांच्या जीवनातील मोठी दोन तत्वे होती. त्यानी आयुष्यभर 'भगवदगीतेला मतृस्थानी मानले. ते स्थितप्रज्ञ वृतीचे होते.निष्काम कर्मयोग ही त्यांची साधना होती.त्यानी समाधी मरण स्वीकाले.      स्वत:च्या आईला गीता समजावी म्हणून त्यांनी गीताई हे गीताचे मराठीत भाषांतर केले.या पुस्तकाच्या २४४...

बी.ए भाग ३/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ / सञ पाचवे/ साहित्यविचार/ पौर्वात्य साहित्य लक्षणा व भामहाची साहित्य व्याख्या

बी.ए भाग ३ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ सञ   पाचवे साहित्यविचार विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील पौर्वात्य साहित्य लक्षणा व  भामहाची साहित्य व्याख्या :         प्रस्तावना:                      संस्कृतमध्ये साहित्याला 'काव्य' हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो.काव्याच्या केवळ पद्यभागासच तो वापरला जातो असे नसून सगळ्याच साहित्याचा अंर्तभाव या 'काव्य' शब्दात केला जात असे." वाणीच्या माध्यमातून जे-जे व्यक्त होते ते-ते वाड्मय असते" असे मानले जाते. काव्य या शब्दात मानवी भावसृष्टीचे रमणीय दर्शन घडविणारे सौंदर्यप्रधान साहित्य अपेक्षित आहे.      म्हणूनच दंडीपासून ते जगन्नाथापर्यंत संस्कृत किंवा पूर्वकालीन म्हणजेच पौर्वात्य साहित्यशास्ञज्ञानी केलेली काव्यलक्षणे हीच साहित्यलक्षणे आहेत.      जगन्नाथाने शब्दांना महत्व दिले आहे. पण हे शब्द रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे असावेत असे म्हटले आहे. आनंदवर्धन याने 'ध्वनी' हा काव्याचा आत्मा आहे असे म्हटले आहे तर वामनाने 'रीती' ला काव्य...

बी. ए.भाग ३ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ /सञ :पाचवे / साहित्यविचार /घटक १/साहित्याचे स्वरुप / साहित्याचे स्वरुपविशेष

बी. ए.भाग ३ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ७ सञ :पाचवे साहित्यविचार घटक १साहित्याचे स्वरुप  विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील.         साहित्याचे स्वरुपविशेष                    "साहित्य" हा शब्द वाड्मयाबरोबरच आपण रोजच्या व्यवहारात अनेक वेळा वापरतो. जसे लेखन साहित्य म्हणजे कागद, पेन, लिहावयाचे पॅड इत्यादी तसे बांधकाम साहित्य, स्वंपाकाचे साहित्य, शिवणकामाचे साहित्य असे वेगवेगळे शब्दप्रयोग आपण करतो तसेच वाड्ममयाच्या संर्दभातही साहित्य हा शब्द वापरला जातो.         वाड्ममयाच्या  प्रांतात साहित्यहा शब्द व्यापक अर्थाने घेतला जातो.जसे कथा, कविता, कादंबरी, नाटक,चरिञ,प्रवासवर्णन,निबंध इ.संस्कृत साहित्यशास्ञात वाड्मयासंबंधी विचार करताना वाड्मय या ऐवजी काव्य हा शब्द वापरलेला दिसतो.तर आजच्या आधुनिक काळात  ललित वाड्मय हा शब्दप्रयोग अधिक रुढ झाला आहे.      औषधोपचारांची माहिती किंवा एखाद्या व्यक्तीची कुंडली हेही लिहिले जाते.पण याला कुणी साहित्य  किवा वाड्मय  म्हणत नाही  क...

बी. ए. भाग१/ ऐच्छिक मराठी(अक्षरबंध) / अभ्यासक्रमपञिका क्रं १ / विभाग ४ / चिञपट :आस्वाद प्रक्रिया / चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.

बी. ए. भाग१ ऐच्छिक मराठी(अक्षरबंध) अभ्यासक्रमपञिका क्रं १ विभाग ४  चिञपट :आस्वाद प्रक्रिया विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील चिञपट 'ध्वनी' व 'प्रकाश योजना': तांञिक बाबी.     प्रस्तावना:             चिञपटासाठी केवळ कथानक,नायक-नायिका आणि दिग्दर्शक यांचीच आवश्यकता असते असे नाही,तर एका चिञपठासाठी शेकडो कलाकार,तंञज्ञ काम करत असतात.अनेक कला मिळून एक चिञपट तयार होत असतो. यामध्ये ध्वनीला अनन्यसाधारण महत्व आहे 'श्रवणेंद्रियाला ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय'. असे अक्षरबंध या पाठ्यापुस्तकात म्हटले आहे.       आपण चिञपट पाहत असतांना असंख्य प्रकारचे ध्वनी ऐकू येत असतात.पाञांच्या हालचालीमुळे काही ध्वनी निर्माण होतात. जसे एखाद्या स्ञीपाञाच्या बंगड्यांचा किंवा पायातल्या पैंजणांचा आवाज होतो.पुरुपाञ चालत आले की त्याच्या बुटाचा आवाज होतो. स्वंपाक घरातील शिट्टीचा आवाज...अशा असंख्य ध्वनींनी आपले जग भरले आहे.या ध्वनीच्या आवाजावरुन त्या त्या दृश्याचा विशिष्ट परिणाम अधोरेखित होतो.या शिवाय घोंघावणार्‍या वार्‍याचा,...

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रम पञिका ४ सञ ३ / काव्यगंध/ नारायण सुर्वे (श्रमविषयक कविता) /५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट

(E-content created by Patil B. K.) बी. ए. भाग २ मराठी अभ्यासक्रम पञिका ४ सञ ३ काव्यगंध नारायण सुर्वे  (श्रमविषयक कविता) ५ नेहरु गेले त्या वेळची गोष्ट           नेहरु गेले त्या वेळची गोष्ट: राजकीय भान व्यक्त करणारी कविता               ही सुर्वे यांची महत्वाची कविता आहे. १९६४ च्या मे महिन्यात एका संध्याकाळी रेडिओवर नेहरु गेले ही बातमी प्रसृत झाली. ही बातमी ऐकताच सुर्वे यांना धक्का बसला, आता प्रकाश संपला हे पार्लमेंटमध्ये उच्चारलेले वाक्य त्यांच्या कानात घुमत होते.       या कवितेचे एक वैशिष्टे म्हणजे कवीने पं. नेहरु यांच्या निधनानंतर लिहिलेल्या या कवितेत नेहरुंचे कार्य, त्यांचे चरिञ याविषयी एकही ओळ नाही.पण सुर्वे यांच्या कवितेतील सुचकताफार बोलकी असते.अनेक संदर्भांना ही कविता सहज स्पर्श करते.    "पाठ शेकवत बसलेली घरे कलकलली       शहर कसे करडे होत गेले        नंतर अजिरी  पुढे..... काळोखाने माणिक गिळले."   इथे शहर करडे होणे नंतर अजिरी होणे व काळोखाने माणिक गिळ...